अर्नबसाठी गळे काढणारे,महाराष्ट्राचा,रामशास्त्रीबाणा विसरले का?

मुंबई(प्रतिनिधी): सुशांतसिंग राजपूत व कंगणा राणावतमुळे मुंबईसह महाराष्ट्रात अडगळीत पडलेले,गल्लीतही ज्यांच्याकडे कोणी ढुंकून बघत नाहीत असे राजकारणी टिवटिव करीत,काही प्रसिद्धी माध्यमांना हाताशी धरून प्रसिद्धी मिळविण्याचा केविलवाणी प्रयत्न वकिलपत्र घेतल्याप्रमाणे करीत होते आणि मुंबईसह महाराष्ट्राबद्दल कृतघ्नतेची भावना व्यक्त करीत होते.ते आज गायब झालेले दिसतात अशा फंदफितुरांना काय म्हणावे?आतातर अर्नब गोस्वामी यांच्या अटकेवरून दिल्ली पासून गल्लीपर्यंत गळे काढले जावेत याला काय म्हणावे.सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी होते तर मग अन्वय नाईक यांच्या आत्महत्येची चौकशी का नको अशी खंत डेग्निटी फौंडेशन एक्सलिन्सी पुरस्कारने सन्मानित दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केली.

आता तर अर्नब गोस्वामीवरून हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळत आहे.अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्नब गोस्वामी यांना अटक झाली आहे. तपास चालू आहे पण टिवटिव करणाऱ्याना उधान आले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला जात आहे,अशी ओरड होत आहे ती का ते कळत नाही. एका अन्यायग्रस्त महिलेला न्याय देण्याऐवजी केवळ सत्तेचे राजकारण केले जात आहे.एका महाराष्ट्रीयन कुटुंबाला न्याय मिळवून देणे ही मुंबईसह महाराष्ट्रातील तमाम जनतेची मागणी होत असताना काही जण विनाकारण थैयथयाट का करीत आहेत?राज्य सरकारला आव्हान देणे,म्हणजे राज्यातील तमाम जनतेचा एकप्रकारे अपमानच म्हटला पाहिजे.राज्यातील महाविकास आघाडीने लोकशाहीचा गळा घोटू पहाणाऱ्याना चांगली चपराक देण्याचा जो प्रयत्न चालविला आहे तो अभिनंदनीय आहे. सरकार चांगले काम करीत असताना त्यात मिठाचा खडा टाकण्याचे काम चालले आहे. फंदफितुरांसह उपऱ्यानी विनाकारण राज्यात अशांतता पसरविण्याचे काम न करणे हिताचे आहे.प्रसिद्धी माध्यमेही मुंबईसह महाराष्ट्राशी द्रोह करणाऱ्यांना डोक्यावर का उचलून घेतात?एवढी प्रसिद्धी का देतात?खोटेनाटे आरोप करणाऱ्यांना ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली वारेमाप प्रसिद्धी देण्यामागे काय दडले आहे.उठसुठ प्रसिद्धी माध्यमासमोर येऊन आरडाओरडा करीत आरोप करणारे मा.न्यायालयात धाव मात्र घेताना दिसत नाहीत?मुंबईसह महाराष्ट्रात पोटाची खळगी भरायला आलेल्या पाहुण्यानी पाहुण्यासारखेच राहिले पाहिजे विनाकारण मराठी भाषिक आणि मराठी राज्यात ढवळाढवळ करू नये आणि मराठी भाषिकानी अशी केलेली ढवळाढवळ सहनही किती करावी.मुंबईसह महाराष्ट्राचा स्वाभिमान मेला का?याचे गांभिर्य कोणालाच कसे नाही? असे मत शिरवडकर यांनी व्यक्त केले.

भक्तांची डोकी भडकावून सत्तेचे राजकारण करणाऱ्यांची आलिशान घरे आणि डोळे दिपवणारी संपत्ती तर दुसरीकडे उपाशीपोटी बोंब मारणाऱ्या भक्तांची स्वतःची झोपडीही नाही.नोकरीही नाही. आतातर खायला अन्न मिळणे कठीण झाले आहे.भक्तगण याचा विचार कधी करणार.अशी खंत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांकडून सन्मानित दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केले.

                     

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट