
ज्या गावात बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली त्याच पुतळ्यासमोर विद्यार्थी दिनी भिम आर्मीची विचार परिषद होणार.
अशोकभाऊ कांबळे यांची जाहीर घोषणा.
- by Adarsh Maharashtra
- Nov 03, 2020
- 1602 views
मुंबई(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात असणाऱ्या बर्दापूर ह्या गावात काही दिवसांपूर्वी विकृत विचारसरणीच्या जातीयवादी नफरतखोरांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची विटंबना केली साहजिकच ह्या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटणे स्वाभाविक होते.सदरहू घटनेची वार्ता कळताच भिम आर्मीचे महाराष्ट्र राज्य संघटक मा.अक्षयजी धावारे , लातूर जिल्ह्याप्रमुख मा.विलासअण्णा चक्रे , बीड जिल्हाप्रमुख मा.गोपीनाथराव गायकवाड तसेच बीड ग्रामीण जिल्हाप्रमुख मा. सिध्दार्थजी मायंदळे यांचेसह भिम आर्मीचे कार्यकर्ते व पदाधिकारी घटनास्थळी धावले.लगोलग भिम आर्मीचे राष्ट्रीय नेते मा.अशोकभाऊ कांबळे हेसुद्धा घटनास्थळी जाऊन त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ताबडतोब पोलीस स्टेशन गाठून आंबेडकरी समाजाच्या तीव्र भावना त्यांच्या कानी घातल्या आणि आरोपींना ताबडतोब अटक न केल्यास त्याच्या होणाऱ्या परिणामांची जबाबदारी ही तेथील पोलीस प्रशासनाचीच रहाणार असल्याचा जाहीर इशारा दिला आणि लगेच वेगाने पोलिसी सूत्रे हलली. त्यात पोलिसांना एक आरोपी पकडण्यात यश आले असल्याची माहिती स्वतः पोलीस अधिकाऱ्यांनी भिम आर्मीचे राष्ट्रीय नेते मा.अशोकभाऊ कांबळे यांना दूरध्वनीवरून दिली.
पुरोगामी महाराष्ट्रात वारंवार घडणाऱ्या ह्या घटनांचा अनोख्या पद्धतीने निषेध करण्यासाठी अशोकभाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भिम आर्मी बीड जिल्ह्याच्या वतीने विटंबना झालेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळच ७ नोव्हेंबर शनिवार रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० ह्या वेळेत विद्यार्थी दिनाचे औचित्य साधून एका विशाल विचार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बीड जिल्हाप्रमुख मा.सिध्दार्थजी मायनदळे ह्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
ह्या विचार परिषदेला संबोधित करण्यासाठी राष्ट्रीय नेते मा.अशोकभाऊ कांबळे , राज्य महासचिव मा.सुनीलभाऊ गायकवाड , राज्य उपाध्यक्ष मा.बलराजभाई दाभाडे , राज्य संघटक मा.अक्षयजी धावारे , मराठवाडा प्रमुख मा.बाळूभाऊ वाघमारे , मराठवाडा सचिव मा.आनंदजी खरात , मराठवाडा संघटक मा.कोल्हे साहेब यांचेसह मराठवाड्यातील सर्वच जिल्हाप्रमुख/ तालुकाप्रमुख , कार्यकर्ते , पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती मा.सिध्दार्थजी मायनदळे ह्यांनी दिली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम