
भाज्यांचे भाव भरमसाठ वाढल्याने महिलांचे स्वयपाकाचे बजेट बिघडले.
- by Adarsh Maharashtra
- Nov 02, 2020
- 1173 views
मुलुंड:(शेखर भोसले) ऐन सणासुदीच्या काळात भाज्यांचे व कांदे-बटाटयांचे भाव भयंकर वाढले असल्याने सर्वसामान्यांच्या किचनचे बजेट विस्कळीत झाल्याचे आढळून आले आहे. कोरोनामुळे उत्पन्नाच्या साधनांवर संकट आले असतानाच रोजच्या जेवणासाठी भाजीपाल्यावर अधिकचा खर्च होवू लागल्याने महिला वर्ग संताप व्यक्त करत असून दर फुगवून भाजीपाला विकणाऱ्या व्यापारांवर व किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी करत आहेत.
ऑक्टोबर महिन्याच्या परतीच्या पावसाने मुंबईसह राज्यात धुमाकूळ घातला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बहुतेक शेतकऱ्यांचा शेतीचा माल खराब झाल्याचे तर काही जणांचा माल वाहून गेल्याचे आढळून आले आहे त्यामुळे बाजारात फळ, भाजीपाला, कांदे-बटाटयांचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी किरकोळ विक्रेत्यांनी भाज्यांचे भाव प्रचंड प्रमाणात वाढवून ठेवल्याचे आढळून आले आहे.
कोरोनामुळे काहींचे रोजदार बुडाले आहेत तर काहींच्या कामधंद्यावर परिणाम झाला आहे त्यामुळे आधीच सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असताना किरकोळ विक्रेते अव्वाच्या सव्वा दरात भाज्या, कांदे-बटाटे विकत असल्याने महिलांच्या स्वयंपाकाचे गणित पूर्णतः बिघडले आहे. घराचे बजेट सांभाळताना रोज कोणती भाजी करावी असा प्रश्न त्यामुळे गृहिणीना पडला आहे. त्यामुळे महिला वर्ग व सर्व सामान्य नागरिक प्रचंड संतापला असून हे दर कधी खाली येतील याची वाट पाहत आहेत तसेच भाज्यांचे, कांदे-बटाटयांचे दर फुगवून विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर, किरकोळ विक्रेत्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी करत आहेत.
अवकाळी पाऊसामुळे भाजीपाला पिकांवर मोठा परिणाम झाल्याने भाज्यांचे दर भरमसाठ वाढले आहेत. भाज्यांचे दर ऐकून काही ग्राहक भाजीपाला खरेदी करत नसल्याने भाजी विक्रेत्यांना देखील याचा परिणाम भोगावा लागत असून न विकल्या गेलेल्या नाशवंत भाज्या दुसऱ्या दिवशी टाकून द्याव्या लागत आहेत, अशी प्रतिक्रिया एका किरकोळ भाजी विक्रेत्याने दिली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम