
मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या जान कुमार सानूला बिग बॉस मधून हाकला, अन्यथा शो चालू देणार नाही
संतप्त शिवसेना प्रवक्ते आमदार श्री प्रताप सरनाईकांचा कलर्स वाहिनीला अल्टिमेटम
- by Adarsh Maharashtra
- Oct 29, 2020
- 1003 views
मुंबई : कलर्स वाहिनी वरच्या बिग बॉस सीजन -१४ मध्ये प्रसारित होणाऱ्या एका भागात त्यात सहभाग घेतलेली प्रतिस्पर्धी दुसऱ्या प्रतिस्पर्ध्या सोबत मराठी भाषेत संवाद साधत असतांना अत्यंत मुजोर, मराठी द्वेष्टा जान कुमार सानू नावाच्या प्रतिस्पर्ध्याने मराठी भाषेत बोलू नकोस, हिंदी भाषेत बोल असा अत्यंत चुकीच्या पद्धतीने आरडा ओरडा करून मराठी भाषेचा अवमान केला आहे. त्या बद्दल कलर्स वाहिनी ने जर मुजोर जान कुमार सानू याची या मालिकेतून हकालपट्टी केली नाही, तर सेट वर येऊन शिवसेना स्टाईल आंदोलन करणार असा सज्जड इशारा शिवसेना प्रवक्ते आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी कलर्स वाहिनीला दिला* आहे.
बिग बॉस या मालिकेला प्रामुख्याने महाराष्ट्रीयन प्रेक्षकांच्या प्रचंड पसंती मुळे टीआरपी मिळते, त्याचे शूटिंग महाराष्ट्रात होते आणि त्याच महाराष्ट्राच्या मराठी भाषेचा अवमान त्या मालिकेतला कोणतरी टिनपाट जान कुमार सानू नावाचा स्पर्धक करत असेल तर ते कदापि खपवून घेणार नाही असा कडक इशारा सरनाईकांनी दिला.
सलमान खान ने स्पर्धकांना योग्य ती समझ द्यावी
बिग बॉस शो चा होस्ट आणि बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता सलमान खान अत्यंत उत्तम पद्धतीने हा कार्यक्रम होस्ट करत असतो. परंतु जेव्हा जान सानू सारखी विकृत लोक मराठी भाषेचा अवमान करतात तेव्हा त्याला योग्य तो कानमंत्र देणे हे सलमान खान चे कर्तव्य आहे. परंतु एरवी वैयक्तिक जिवनात मराठी भाषे बद्दल आत्मीयता आणि प्रेम असणारा सलमान यावेळी गप्प का बसला असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. असो. पण सलमान ने अश्या स्पर्धकांना त्याच्या भाषेत समझ द्यावी असे आवाहन देखील आमदार प्रताप सरनाईकांनी अभिनेता सलमान खानला केले आहे
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम