भांडूप मध्ये साडीचोळीने ओटी भरून आरोग्य सेविकांचा सत्कार

मुलुंड:(शेखर भोसले)मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेले 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अभियान यशस्वीरित्या राबवित असलेल्या आणि आपला जीव धोक्यात घालून जनतेची सेवा करणाऱ्या पालिकेच्या एस वार्डच्या आरोग्यसेविकांचा सत्कार भांडूप येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख दिपक सावंत यांच्या धर्मपत्नी गायत्री दिपक सावंत यांनी त्यांच्या घरी केला. भांडूप विभागात प्रत्येक घराघरात जावून लोकांच्या आरोग्याची तपासणी करणाऱ्या  सिस्टर श्रुती पालांडे, छाया देठे, आरोग्यसेविका गीता तायडे, सत्वशीला पवार, उषा धुरे, शोभा खांडेकर, राजश्री सावंत, हेमा मोहिते, रिया परब, छबुताई गोरड, सानवी पोस्तुरे, इत्यादीं आरोग्य सेविकांना आपल्या घरात बोलवून त्यांची साडी चोळीने ओटी भरून त्यांचा सत्कार यावेळी गायत्री दिपक सावंत यांच्यातर्फे करण्यात आला.


"कोरोणा काळात, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करणाऱ्या या योद्धा, साक्षात दुर्गामातेचा अवतार आहेत. या कठीण काळात जनतेची सेवा करणाऱ्या या आरोग्यसेविकांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच माझी पत्नी गायत्री दिपक सावंत हिने नवरात्रोत्सवात देवळात जाऊन ओटी भरणे शक्य नसल्याने या आरोग्यसेविकांना आपल्या घरी बोलावून त्यांचा साडीचोळीने ओटी भरून सन्मान केला", अशी प्रतिक्रिया शाखाप्रमुख दिपक सावंत यांनी यानिमित्ताने दिली आहे.
 
"देवळात फक्त देवाची मूर्ती बंदिस्त होती पण आरोग्यसेविकांच्या रूपाने देव आपल्या भक्तांना मदत करीत होते. गेली सात महिने संपूर्ण देश कोरोनामुळे भयभीत झाला होता. अश्यावेळी सर्व नागरिक लॉकडाऊनमध्ये घरात बसले होते परंतु आपल्या या भगिनी कोरोनाची सुरुवात झाली तेव्हापासून कोरोना बाधितांच्या घरी जाऊन त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या कुटुंबियांना कोरोंटाइन करणे, त्यांना योग्य सल्ला देणे, समाजात जनजागृती करणे हे महान कार्य करत आहेत.
त्यामुळेच माणसातील या देवत्वाचा मी आज सन्मान केला", अशी प्रतिक्रिया गायत्री दिपक सावंत यांनी यावेळी दिली. 

"गेल्या सात महिन्यात आम्हाला कोणी 'घरात या' सुद्धा बोलले नाही परंतु तुम्ही घरात बसवून आमचा सन्मान केला, आमचा गौरव केला. आम्हाला या मुळे खरेच गहिवरून आले आहे", अश्या उत्स्फुर्त प्रतिक्रिया या आरोग्य सेविकांनी दिल्या.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट