
मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला लागलीआग.
- by Adarsh Maharashtra
- Oct 23, 2020
- 1521 views
मुंबई :मुंबई सेंट्रल येथे मुंबई सेंट्रल बस स्थानकाच्या जवळ असलेल्या सिटी सेंटर मॉलला काल (दिनांक २२ ऑक्टोबर २०२०) रात्री सुमारे ८ वाजून ५३ मिनिटांनी आग लागली.
ही माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी अग्नि विमोचन वाहने रवाना केली. मोठ्या प्रमाणावर आग पसरल्याने, पहाटे २ वाजून ४१ मिनिटांनी ही आग ब्रिगेड कॉल स्तराची अग्निशमन दलाने घोषित केली.
सिटी सेंटर मॉल तळमजला अधिक तीन मजले स्वरूपाची इमारत आहे. या ठिकाणी प्रारंभी दुसऱ्या मजल्यावर आग लागली. या मजल्यावर मोबाईल, प्रिंटर, स्टेशनरी, फर्निचर आणि इतर साहित्यांचे गाळे आहेत. या गाळ्याना ही आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ही आग तिसऱ्या मजल्यावर देखील पसरली असल्याचे लक्षात आले.
आग विझवण्यासाठी २४ फायर इंजिन, १६ जंबो टँक यांच्यासह एकूण ५० अग्नि विमोचक वाहने तैनात आणि कार्यरत आहेत.
मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी श्री शशिकांत काळे यांच्यासह एकूण सुमारे २५० अधिकारी व कर्मचारी आग विझवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.
घटनास्थळी मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोरी पेडणेकर, आमदार श्री. अमीन पटेल, महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्री. यशवंत जाधव, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकानी यांनी रात्री उशिरा भेट देवून प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती जाणून घेतली.
सिटी सेंटर मॉलला अगदी लागून असलेल्या ऑर्किड एन्क्लेव या सुमारे ५५ मजली इमारतीमधील अंदाजे ३,५०० रहिवाशांचे सुरक्षिततेची आवश्यकता लक्षात घेऊन जवळच असलेल्या मैदानामध्ये स्थलांतर करण्यात आले आहे.
मुंबई अग्निशमन दलाच्या कार्यामध्ये वाहतूक आणि इतर बाबींमध्ये मदतीसाठी पोलिसांना देखील तैनात करण्यात आले आहे. सिटी सेंटर मॉल आगीची तीव्रता लक्षात घेता बेलासिस रोडवरील दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी मार्ग बंद करण्यात आले आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम