
उल्हासनगर येथील साई गुरुमुखदास चौक बांधकामासंदर्भात समन्वयातून निर्णय घ्यावा- विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
- by Adarsh Maharashtra
- Oct 21, 2020
- 1145 views
मुंबई, दि.२१ : उल्हासनगर येथील साई गुरूमुखदास साहेब चौकाच्या उल्हासनगर महानगर पालिकेमार्फत प्रस्तावित बांधकाम व सुशोभिकरणाबाबत पालकमंत्री आणि महापौर यांच्यासमवेत बैठक घेऊन निर्णय घ्यावा. यासंदर्भात समन्वयातून निर्णय होणे उचित ठरेल, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांनी विधानभवन येथे आयोजित बैठकीत दिल्या.
यावेळी नगरसेविका जया साधवानी, जेसा मोटवानी, ओमी साई, उल्हासनगर महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. राजा दयानिधी, नगरविकास विभागाचे उपसचिव शं.नां जाधव, नगररचनाकार अण्णा गुरगुळे, अंबरनाथचे सहाय्यक पोलीस उपायुक्त विनायक नरळे, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. नगरसेविका जया साधवानी यांनी यासंदर्भात दिलेल्या निवेदनानुसार ही बैठक घेण्यात आली.उल्हासनगर शहरातील रस्ते,चौक व सार्वजनिक जागांचे नामकरण करण्यासंदर्भात याआधी ठराव घेण्यात आला. परंतु या विषया संदर्भात दुमत असल्याने व हा विषय भावनिक असल्याने योग्य निर्णय घेणे गरजे आहे. यासाठी योग्य शाहनिशा करून समन्वयातून निर्णय घ्यावा, असेही यावेळी नाना पटोले यांनी सांगितले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम