मोठ्या आजारापासून ४ हात दूर रहायचे असेल तर रोज दोन-तीन लवंग चघळा


हे आहेत लवंग खाण्याचे १८ गुणकारी फायदे; वाचा सविस्तर-

भारतीय संस्कृतीमध्ये असे अनेक पदार्थ आहेत की ज्याचा उपयोग दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. भारतीय मसाले हे वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्यामुळे भारतीयांची रोगप्रतिकारशक्‍ती ही खूप जास्त असते. सध्या कोरोना काळ असला तरी इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतातील मृत्यू दराची संख्या अतिशय कमी आहे.त्याला आपल्या आहारात असलेल्या मसाल्यांच्या पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर वापर हे महत्त्वाचे कारण आहे.

तसेच भारताची रुग्ण संख्या देखील आटोक्यात आलेली आहे. भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे जवळपास 85 टक्के च्या वर पोहोचले आहे. याचे कारण म्हणजे भारतीयांची आहार-विहार पद्धती आहे. भारतीय लोक हे अतिशय मसालेदार आणि तिखट पदार्थ खातात. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती ही अतिशय वाढते. भारतातील मसाल्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लवंग या पदार्थाविषयी आपल्याला आम्ही माहिती देणार आहोत.

लवंगचा उपयोग आपण मसाल्यात देखील करतो. तसेच दैनंदिन खाण्यात देखील वापरता येते. जेवण झाल्यानंतर लवंग खाल्ल्यानंतर आपल्याला त्याचे अनेक फायदे होतात. लवंग मध्ये अक्सिडेंट आणि आणि बॅक्टरियल तत्व असतात. त्यामुळे लवंग हे अनेक आजारांवर गुणकारी आहे. आम्ही या लेखांमध्ये आपल्याला लवंगचे फायदे सांगणार आहोत.

१. मासिक पाळी : अनेक महिलांना मासिक पाळीचा त्रास असतो. दैनंदिन जीवनात लवंग एक तुकडा रोज खाल्ल्यास पाळीचा त्रास महिलांना होत नाही. पाळी वेळच्या वेळी येते.

२. सर्दी खोकला: आपल्याकडे अनेक जणांना सर्दी खोकल्याचा त्रास असतो. अनेकदा औषधी गोळ्या घेऊन देखील हा त्रास कमी होत नाही. मात्र, आपण दैनंदिन जीवनात लवंग खाल्ल्यास हा त्रास कमी होऊ शकतो. लवंगेचा एक तुकडा खाल्ल्यास सर्दी किंवा खोकला कमी होऊ शकतो.

३.चेहऱ्यावरील पुरळ: तारुण्यात अनेक तरुण-तरुणींना मुरूम, पुरळ समस्या जाणवते. जर तुम्ही लवंग आपल्या खाण्यात वापरली तर हा त्रास कमी होऊ शकतो.

४. पचनक्रिया सुधारते : अनेकांना पचनक्रियेचे त्रास असतात. अनेक जण बाहेरचे खातात. त्यामुळे त्यांची पचन क्रिया ही बिघडते. मात्र, जेवणानंतर लवंग खाल्ल्यास ही क्रिया चांगली सुधारते.

५. दात दुखी: काही जणांना अचानक दात दुखीचा त्रास सुरू होऊ शकतो. मेडिकलमधील गोळ्या खाण्यापेक्षा आपण जो दात दुखतोय त्याचा खाली लवंग ठेवल्यास ताबडतोब आराम पडू शकतो

६.तोंडाची दुर्गंधी : अनेकदा आपण समोरच्या व्यक्तीला बोलत असताना तोंडाचा वास एकदम येतो. त्यामुळे असा वास येत असल्यास लवंग खावी. त्यामुळे तुमच्या तोंडाची दुर्गंधी ही नाहीशी होते.

७. सांधेदुखी : आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये अनेकांना सांधेदुखीचा त्रास जाणवतो. त्यामुळे आपण दैनंदिन जीवनामध्ये लवंग चा वापर केल्यास आपली सांधेदुखी ही काही प्रमाणात कमी होऊ शकते.

८. लवंगामध्ये युजेनॉल असतं त्यामुळे सायनस किंवा सर्दी सारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते.

. लवंग उष्ण गुणधर्माची आहे. त्यामुळे सर्दी किंवा खोकला झाल्यास लवंग चघळावी किंवा चहा करताना त्यात १-२ लवंगा टाकाव्यात.

१० .कफ विकारात गुणकारी.

११. पोटदुखी दूर होते.

१२. सतत तहान लागत असल्यास लवंग खावी.

१३.दमा, उचकी,रक्तविकार यात समस्येमध्ये लवंग खाल्यास आराम मिळतो.

१४.लवंगाच्या तेलामुळे घसा, गळा, गाल, जीभ सर्व स्वच्छ राहते.

१५.सर्दीमुळे नाक वारंवार बंद होत असेल तर लवंगाच्या तेलाचे दोन-चार थेंब रुमालावर टाकून ते हुंगावे त्यामुळे नाक मोकळं होतं.

१६.जुनाट सर्दी असल्यास डोक्यावर लवंग,सुंठ आणि वेखंड यांचा लेप करुन लावावा.

१७.दात दुखत असल्यास लवंगाचं तेल, कापूस व किंचित तूप एकत्र करुन कापसाचा बोळा दुखऱ्या दातावर ठेवावा. मात्र, लवंग तेलाचे प्रमाण कमी असावे.

१८.अनेकदा वृद्ध व्यक्तींना बोलताना ठसका किंवा धाप लागते अशा वेळी १ लवंग चघळावी.

१९ .लवंग बुद्धी तल्लख ठेवते.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट