खंबीर नेतृत्वामुळे संघटना पुढे जाईल-निवृत्ती देसाई

मुंबई दि.१७:लॉकडाऊनच्या काळातही अध्यक्ष सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या खंबीर नेतृवाखाली संघटनेने कामगारांच्या प्रश्नावर आवाज उठवून आपली ताकद दाखवून दिली आहे.कामगारांनी अशीच एकजूट संघटने मागे उभी केली तर त्यांना भविष्यातील कोतत्याही कठीण प्रसंगाना तोंड देणे अशक्य ठरणार नाही, असा विश्वास राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई यांनी आपल्या वाढदिवसाला उत्तर देताना व्यक्त केला.

निवृत्ती देसाई यांचा ७४ वा वाढदिवस आज मजदूर मंझील मध्ये पदाधिकार्यांच्या सभेत कौटुंबिक स्वरूपात करण्यात आला.अगदी मोजक्या उपस्थितीत सामाजिक अंतर आणि मास्क वापराचे नियम पाळून हा अभिष्टचिंतनाचा सोहळा साधेपणाने पार पडला.उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर  यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले.

खजिनदार निवृत्ती देसाई आपल्या भाषणात पुढे म्हणाले,एन.टी.सी.गिरण्या चालू करा, कामगारांना बंदच्या काळातील पूर्ण पगार द्या,तसेच कामगार कायद्यातील बदलावर संघटनेने अलिकडेच यशस्वी आंदोलन छेडून कामगारांच्या प्रश्नावर आपली तत्परता दाखवून दिली आहे.संघटनेच्या नेतृत्वाने आपल्याला वेळोवेळी संधी दिल्या मुळे आणि विश्वास दाखविल्या मुळे आज आपल्याला विविध क्षेत्रात मान सन्मान मिळाला आहे.संघटनेच्या उन्नतीसाठी असेच आपण काम करत राहू,असा विश्वासही श्री देसाई यांनी आपल्या भाषणात शेवटी व्यक्त केला.

सर्वश्री उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर,सेक्रेटरी शिवाजी काळे,संपादक काशिनाथ माटल,सहकारी संस्थेचे महाव्यवस्थापक विलास डांगे, कामगार शिक्षण विमाग उपप्रमुख मोहन पोळ, संघटन सचिव एम.पी.पाटील,मधू घाडी आदींनी आपल्या भाषणात सांगितले की निवृत्ती देसाई यांनी संघटनेत चौफेर काम करून संघटनेच्या प्रगतीला हातभार लावला आहे.


रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट