मुंबईसह अन्य महानगरांमध्ये सीजीआयच्या,साहाय्याने शाळांमध्ये नाविण्यपूर्ण उपक्रम

नवी दिल्ली,१३ : मुंबईसह, बंगळूर, चेन्नई आणि  हैद्राबाद येथील १०० शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब (एटिल) अंतर्गत नाविण्यपूर्ण कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने अटल इनोव्हेशन मिशन (AIM) आणि नीति आयोगाने, सीजीआय इंडिया सोबत करार केला आहे.मुंबईसह अन्य महानगरांमध्ये सीजीआयच साहाय्याने शाळांमध्ये नाविण्यपूर्ण उपक्रम

सीजीआय इंडिया ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी कंपनी असून अटल टिंकरिंग लॅब अंतर्गत येणाऱ्या मुंबईसह अन्य महानगरांमध्ये सीजीआयच्या साहाय्याने शाळांमध्ये नाविण्यपूर्ण उपक्रम

शाळांना तंत्रज्ञान क्षेत्रात यशस्वी व नाविण्य पूर्ण सहकार्य करण्यासाठी तयार झाली आहे.

करारांतर्गत सीजीआयने, मुंबईसह, बंगळूर, चेन्नई,  हैद्राबाद येथील १०० शाळा दत्तक घेतल्या आहेत. सीजीआय इंडियाचे तांत्रिक प्रशिक्षक विद्यार्थ्यांमधील तंत्रज्ञानाविषयी गोडी वाढवून त्यांना व्यावहारिक प्रशिक्षण देतील. सीजीआय निवडक शाळांमध्ये शिक्षकांसाठी तंत्रज्ञानाविषयक प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा  आयोजित करतील.

अटल इनोव्हेशन मिशन केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. याअंतर्गत भारत सरकार देशभरातील नाविण्यपूर्ण, उद्योजकता संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचे कार्य करते. अटल इनोव्हेशन मिशनतंर्गत येणा-या एटीएलमध्ये देशभरातील २.५ दशलक्षाहून अधिक शाळेकरी विद्यार्थी समाविष्ट आहेत. एटीएल अंतर्गत असणाऱ्या प्रयोगशाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वत: काही वेगळे करण्यासाठी प्रशिक्षण किट दिली जाते. विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला यामुळे अधिक वाव मिळतो. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा उत्कृष्टपणे करता येईल  याचे यातंर्गत प्रशिक्षण दिले जाते.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट