
उत्तर प्रदेश मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा या मागणी करीता काँग्रेस व भिमशक्ती संघटनेची चेंबूर परिसरात रॅली व निदर्शने!
- by Adarsh Maharashtra
- Oct 06, 2020
- 508 views
मुंबई ( जीवन तांबे )उत्तर प्रदेश मधील हाथरस जिल्ह्यामध्ये झालेल्या मनीषा वाल्मिकी हत्या प्रकरणाला योगी सरकार जबाबदार असल्याने हे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणी करिता माजी समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली आज चेंबूर परिसरात भव्य रॅली काढून मोठया प्रमाणात निदर्शने करण्यात आली.
उत्तर प्रदेश मध्ये हाथरस मध्ये घडलेल्या मनीषा वाल्मिकी बलात्कार प्रकरणातील दोषी नराधमांना फाशी देण्यात यावी, हाथरस जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेतील दोषी अधिकारी तसेच काँग्रेस नेते खा. राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना धक्काबुकी करणाऱ्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी या मागणी करीता आज चेंबूर परिसरात काँग्रेस व भिमशक्तीच्या कार्यकर्त्यांनी भव्य रॅली काढत योगी सरकारचा निषेध केला.
या रॅली व निदर्शनात माजी समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे, नगरसेविका संगीता हंडोरे तसेच माजी नगरसेवक दिपक शिसोदे, मुंबई काँग्रेस सचिव लक्ष्मण कोठारी तसेच अनेक महिला व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी होते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम