हॉटेल्स सुरू करण्याबाबत लवकर तोडगा काढावा - गोविंद (अण्णा) शेट्टी
- by Adarsh Maharashtra
- Sep 27, 2020
- 697 views
मुंबई : कोरोना संकटात बंद करण्यात आलेल्या हॉटेल्सना सुरू करण्याबाबत अद्यापही शासनाची संदिग्धता आहे, त्याचबरोबर या बंदमुळे हॉटेल व्यवसाय डबाघाईला आला असून अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे, त्यामुळे कुठल्याही पद्धतीने मध्य काढून हा व्यवसाय सुरू करण्याची कार्यवाही व्हावी, अशी मागणी ज्येष्ठ हॉटेल व्यावसायिक गोविंद (अण्णा) शेट्टी यांनी केली आहे. याबाबत आहार संघटना करत असलेल्या प्रयत्नांनाही शासनाने अटींच्या अधीन ठेवून मान्यता द्यावी, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या निवेदनात म्हटले आहे.
सध्याच्या काळात अनेक महिने बंद राहिल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. छोटे हॉटेल व्यावसायिक उद्धवस्त झाले आहेत. या उद्योगातील मजूरदेखील बेकार आहेत. आपल्या गावी अनेकजण परतले आहेत. त्यामुळे मुंबई किंवा अन्य शहरांमध्ये त्यांची कमतरता भासत आहे. याबाबत शासनाने नियम व अटी घालून दिल्या तर त्यानुसार व्यवसाय करता येईल तसेच या उद्योगाला संजीवनीदेखील मिळेल. याविषयी गंभीरपणे विचार व्हायला हवा, केवळ कोरोनाचा फैलाव होईल म्हणून हॉटेल्स बंद ठेवणे चुकीचे असून त्याच्यातून मार्ग काढण्याची आणि हा उद्योग जिवंत ठेवण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम