
गोवंडीमध्ये किरकोळ वादातून तरुणाची हत्या!
- by Adarsh Maharashtra
- Sep 26, 2020
- 640 views
मुंबई ( जीवन तांबे )गोवंडी येथील शिवाजी नगर परिसरतील तसलिम कुरेशी वय- 19 या तरुणाची ता.25 रात्री किरकोळ वादातून हत्या करण्यात आली.
या गुन्ह्यातील चौघा आरोपी विरोधात शिवाजी नगर पोलिसांत शनिवारी तक्रार दाखल झाली असून पोलीस अधिक करीत आहे.
शिवाजी नगर तस्लिमला आरोपीनी,तू गांजा पितोस असे चिडवले. यावरून आरोपींसोबत वाद झाला. वाद इतका वाढला की आरोपीनी तलवारीने तसलिमवर हल्ला करीन त्याला गंभिर जखमी केले. नातेवाईकांनी तसलिमला शीव येथील पालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
तसलिमचा भाऊ याने तत्काळ शिवाजी नगर पोलिसांत तक्रार दाखल केली असता पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला.
पोलिसांनी या गुन्ह्यातील तिघांना अटक केली आहे. या गुन्हातील एक आरोपी अद्याप फरारी आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम