
अत्यावश्यक सेवा वगळता आज मुंबई राहणार बंद, महापालिकेनं केलं आवाहन
तुफान पावसाने मुंबईची दाणादाण, मुंबईत सुट्टी जाहीर, आयुक्त इक्बाल चहल यांची घोषणा
- by Adarsh Maharashtra
- Sep 23, 2020
- 1498 views
मुंबई, २३ सप्टेंबर : मुंबईत पावसानं शनिवारी संध्याकाळपासून जोर धरला आणि रात्रभर धुमशान सुरू होतं. जवळपास १८० मिमीहून अधिक पावसाची नोंद पहाटेपर्यंत करण्यात आली असून आता प्रशासनाकडून अलर्ट करण्यात आला आहे. मुंबईत अनेक भागांमध्ये ३ फुटांपर्यंत रस्त्यावर आणि घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे दाणादाण उडाली आहे. रेल्वे स्थानकात रस्त्यांवर पाणीच पाणी असल्यानं वाहतुकीचा पूर्ण खोळंबा झाला आहे.
मुसळधार पावसामुळे आणि एकूण सध्याची परिस्थिती पाहता बृहनमुंबई महापालिकेनं आज नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. अत्यावश्यक सेवा आणि कामं वगळता नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच खासगी कार्यालये आणि इतर कामकाज बंद ठेवण्याचं आवाहन महापालिका आयुक्तांनी केलं आहे.
हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे याच पार्श्वभूमीवर आज बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त श्री. इक्बाल सिंह चहल यांनी महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
रात्रभर मुंबई-ठाणे, नवी मुंबईसह उपनगरां मध्ये पावसाचं धुमशान सुरू आहे. शनिवारी संध्याकाळपासून सुरू असलेल्या पावसानं रात्री जोर धरला आणि मुंबईकरांची दाणादाण उडाली.लोकल सेवा पासून रस्त्याच्या वाहतुकीपर्यंत आणि दुकानांपासून ते घरापर्यंत अनेकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सखल भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक खोळंबली तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची झोप उडाली.मुंबईत दादर-कुर्ला आणि कुर्ला ते मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं लोकलच्या ४ सेवा विस्कळीत झाल्या आहेत. झव्हेरी बाजार परिसरात इलेक्ट्रिक लाईट बंद पडल्या आहेत तर अनेक ठिकाणी दुकांनांमध्ये पाणी शिरलं आहे.रात्रभर मुंबई-ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचं धुमशान सुरू आहे. मुसळधार पावसाने अख्खी मुंबई पाण्याखाली गेली आहे.
मुंबई पुन्हा तुंबली
मुंबईतील हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परेल, सायन, वांद्रे यांसह ठिकठिकाणी गुडघ्याएवढं पाणी साचलं आहे. तसेच सांताक्रुझ, अंधेरी यासह पश्चिम उपनगरात घरांमध्ये पाणी शिरले आहे.मुंबईतील मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा तसेच रस्ते वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. अनेक रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वे तसेच पश्चिम रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक चाकरमानी हे अडकून पडले आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम