मुलुंडमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या! मागील १८ दिवसांत २००० कोरोना रुग्ण

मुलुंड :(शेखर भोसले) कोरोनाचा संसर्ग पसरून सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला तरी अद्याप कोरोना आटोक्यात येताना दिसत नाही आहे. पालिकेच्या टी वार्डातील मुलुंड परिसरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठया संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत असून गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक दिवशी १०० पेक्षा अधिक रुग्ण मुलुंड विभागात आढळत असल्याने पालिका प्रशासन व मुलुंड पोलिसांपुढे नवे आव्हान उभे राहिले आहे. दि २० सप्टेंबरला दिवसभरात मुलुंडच्या टी वार्डात एकूण १०७ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने मुलुंडकरांच्या मनात पुन्हा एकदा भीतीची छाया उमटली आहे. शासनाने कोरोनापासून बचावासाठी सांगितलेल्या नियमांचे पालन करून व योग्य ते सोशल डिस्टन्स राखूनही कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने कोविड १९ वर लस कधी येणार याची आतुरतेने मुलुंडकर वाट पाहत आहेत.  

दि २० सप्टेंबरला टी वार्डात १०७ रुग्ण आढळून आले त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ८२९७ वर पोहचली असून त्यात सध्या उपचार घेणाऱयांची संख्या १६०२ असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६३६५ आहे तर मृतांची एकूण संख्या ३३० झाली आहे. १८ दिवसांपूर्वी मुलुंडमधील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ६४०० होती, ती आता वाढून ८३०० पर्यंत पोचली आहे. म्हणजेच साधारण १९०० रुग्ण या १८ दिवसांत वाढले असून सरासरी १०० पेक्षा अधिक रुग्ण प्रत्येक दिवसाला मिळत आहे त्यामुळे मुलुंडकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ़ झालेली दिसत असली तरीही कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेच्या टी वॉर्डने मुलुंड पूर्व आणि पश्चिम येथे मोफत कोरोना चाचणी केंद्रे सुरु केली असल्याने तसेच मुलुंडकर या केंद्राचा लाभ घेत असल्याने कोरोना रुग्ण वाढत असून लवकरच हे प्रमाण कमी होवू शकते असे टी वॉर्ड पालिका अधिकाऱयांनी सांगितले. कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" हे अभियान सुरु केले असून त्याअंतर्गत घरोघरी जाऊन पालिका कर्मचारी व स्वयंसेवक नागरिकांची तपासणी करत आहेत. 

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट