शासकीय कर्मचा-यांच्या 100 टक्के उपस्थितीच्या अटीचा फेरविचार न झाल्यास निषेध दिनास पाठिंबा भाऊसाहेब पठाण यांची घोषणा

मुंबई :महाराष्ट्र शासनाने सर्व राज्य शासकीय कार्यालयात केलेली 100 टक्के अनिवार्य उपस्थितीची अट सध्याच्या कोरोनाच्या काळात प्रतिकूल परिस्थिती असताना फेरविचार करून शिथिल करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने घोषित केलेल्या 21 सप्टेबंर 2020 या निषेध दिनास राज्य सरकारी गट ड – चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचा पाठिंबा असल्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी केली आहे. यासंदर्भातील पत्रदेखील त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. सध्याच्या कोरोनाच्या संकटाच्या भीतीदायक वातावरणात वैद्यकीय असुविधा, सुरक्षेची नसलेली हमी आणि वाहतूकीची गैरसोय या बाबींकडे दुर्लक्ष करून संघटनांना विश्वासात न घेता एकतर्फी विचार करून निर्गमित केलेल्या या शासनाच्या आदेशातील निर्बंध तातडीने शिथिल करावेत, तसेच येत्या आठवडाभरात हा निर्णय जाहीर करावा, अशी संघटनांची मागणी आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी 21 सप्टेंबर 2020 या दिवशी निषेध दिन जाहीर केला आहे.

मंत्रालयासर सर्वच शासकीय कार्यालयात वर्दळ वाढली असून मंत्रालयात येणारे अभ्यागत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नाही. मास्क तसेच सॅनिटायझऱ वापरण्याची खबरदारी घेत नाहीत. अशा परिस्थितीत शासकीय अधिकारी व कर्मचा-यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रार्दुभाव वाढत आहे. म्हणूनच अधिकारी महासंघाने केलेली मागणी रास्त असून राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचा या मागणीला पूर्ण पाठिंबा आहे. तरी शासनाने याबाबत फेरविचार करावा, अशी मागणीही भाऊसाहेब पठाण यांनी केली आहे. महाराष्ट्र शासनाने काढलेल्या या आदेशाचा पुनर्विचार करून कर्मचा-यांची कार्यालयातील 100 टक्के अनिवार्यता रद्द करावी, अन्यथा महासंघाच्या वतीने भविष्यात होणा-या आंदोलनाला चतुर्थ श्रेणी कर्मचारी खांद्याला खांदा लावून साथ देतील, याची शासनाने दखल घ्यावी, असेही भाऊसाहेब पठाण यांनी म्हटले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट