
चिंता वाढली:राज्यात पुन्हा नव्या कोरोना रुग्णांची उच्चांकी वाढ
- by Adarsh Maharashtra
- Aug 28, 2020
- 595 views
मुंबई, २८ ऑगस्ट : राज्यातील रुग्णवाढीचा वेग कायम असून, सलग तिसऱ्या दिवशी राज्यात १४ हजारांपेक्षा जास्त नागरिक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आतापर्यंत ५ लाख ४३ हजार १७० रुग्ण बरे झाले आहेत. तर आज दिवसभरात ११ हजारांहून जास्त रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
राज्यात आज पुन्हा एकदा 14 हजार 364 नवे रुग्ण आढळून आलेत. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने 14 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची भर पडत आहे त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये 331 जणांची भर पडली आहे. तर 11 हजार 607 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मृत्यू दर हा 3.16 टक्यांवर आला आहे. राज्यातल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7 लाख 47 हजार 995 एवढी झाली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम