
मी आजही संयम ठेऊन आहे' या शब्दाचा अर्थ काय? -आमदार अतुल भातखळकर यांचा सवाल
- by Adarsh Maharashtra
- Aug 05, 2020
- 784 views
मुंबई, दि. 5 ऑगस्ट, राज्याचे पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरील प्रसिद्धीपत्रकावरुन भाजपा आमदार श्री. अतुल भातखळकर यांनी 'मी आजही संयम ठेऊन आहे' या विधानाचा अर्थ काय? असा प्रश्न श्री. आदित्य ठाकरे यांना विचारला आहे.
राज्य मंत्रीमंडळातील सदस्याने 'मी आजही संयम ठेऊन आहे' अशा प्रकारचे उद्गार काढणे म्हणजे ते धम .की देत आहेत का? असा अर्थ लोकांनी घ्यायचा का? असाही प्रश्न आमदार भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच संयम सुटला तर काय करणार आहात हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला कळण्याची आवश्यकता आहे, कारण राज्यमंत्रीमंडळातील आपल्याच एका सहकार्या वर सामान्य नागरिकाला मारहाण केल्याचे आरोप झाले होते, तशा पद्धतीचे काही करणे अपेक्षित आहे काय? त्यामुळे असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला तर याला जबाबदार कोण ? असे आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे. मुंबई पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत असे पत्रकात म्हटले आहे, परंतु 50 दिवसांनंतर साधा एफआयआर दाखल केलेला नाही, त्या प्रकरणाचा पोलिस सखोल तपास कसा करत आहेत याचेही कायदेशीर ज्ञान महाराष्ट्राच्या जनतेला मान. मंत्री महोदयांनी देण्याची आवश्यकता आहे. श्री. आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री आहेत, परंतु या प्रकरणात पोलिस सखोल तपास करत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. कुठल्याही फौजदारी प्रकरणाचा तपास गृह विभागाच्या अंतर्गत येतो असे असताना या प्रकरणाचा पोलिस सखोल तपास करत आहेत हे त्यांना कसे कळले? गेल्या काही दिवसात ते मुंबईच्या पोलिस आयुक्तांना भेटले अशीही चर्चा आहे. या चर्चेच्या दरम्यान त्यांनी ही सखोल तपासाची माहिती आपणहून घेतली का पोलिस आयुक्तांनी त्यांना दिली याचाही त्यांनी खुलासा करावा. कारण कुठल्याही फौजदारी प्रकरणाची माहिती आरोपपत्र दाखल होईपर्यन्त तपास अधिकारी कोणालाही देऊ शकत नाहीत असे असताना पोलिस सखोल तपास करत आहेत हे ज्ञान श्री. आदित्य ठाकरे यांना कुठून प्राप्त झाले हे जनतेस कळणे आवश्यक आहे. याचा त्यांनी तातडीने खुलासा न केल्यास या संदर्भात योग्य ती कायदेशीर पावलं आपण उचलू असेही आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम