शिवसेनेला कोकणवासियांचा एवढा राग का? ई-पासमध्ये भ्रष्टाचाराचा केला आरोप- आशीष शेलार

मुंबई:कोकणात निघालेल्या चाकरमान्यांची सरकारनं सोय न केल्यानं चाकरमानी गणेशोत्सवासाठी ई-पास काढून जात आहेत. मात्र त्या ई-पासमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप होतो आहे. तर उत्तर भारतीयांना बस आणि ट्रेन, मग कोकणावासियांना का नाही?, असा सवाल विरोधकांनी केला आहे.अनेक चाकरमानी हे गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणाकडे निघाले आहे. मात्र शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांच्या आवाहनावर भाजप आणि मनसेनं आक्षेप घेतला आहे. गणेशोत्सवासाठी आवश्यकता आहे त्यांनीच यावं, बाकीच्यांनी येऊ नये असं विनायक राऊत म्हणाले आहेत.यावरुनच आता भाजपनं सवाल उपस्थित केला आहे कोकणवासियांचा एवढा राग का? असा शब्दात भाजप नेते आशिष शेलारांनी शिवसेनेवर टीका केले आहेत.

एसटी बसद्वारे चाकरमान्यांना कोकणात आणू,असं परिवहन मंत्री अनिल परब वारंवार म्हणाले आहेत मात्र चाकरमान्यांसाठी तशी सोय काही झाली नाही. त्यामुळे ई-पास काढून चाकरमानी कोकणात येत आहेत. मात्र ई-पासमध्येही भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर चाकरमान्यांच्या हातावर क्वॉंरटाईनचा शिक्का मारुन प्रवेश दिला जात आहे. चाकरमान्यामुळं कोरोनाचा फैलाव होऊ नये, म्हणून १४ दिवस क्वॉरंटाईनची अट ग्रामपंचायतींनी ठेवली आहे. त्यामुळं गावातील शाळांमध्ये या चाकरमान्यांना विलगीकरणात ठेवण्यात येतं आहे.पुढील १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी लक्षात घेऊन हजारो चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. त्यामुळे ई पासमधून लूट होणार नाही, एवढी काळजी सरकारने घेतली पाहिजे, असे अनेकांचे म्हणणं आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट