
निस्वार्थी भावनेने केलेली समाजसेवा खऱ्या अर्थाने महत्त्वाची असते - कॅप्टन गणपतराव घोडके
- by Adarsh Maharashtra
- Aug 04, 2020
- 945 views
कोल्हापूर (प्रतिनिधी) निस्वार्थी भावनेने केलेली समाज सेवा खऱ्या अर्थाने महत्त्वाची असते , असे मत विश्ववारणा पब्लिक स्कूल चे संस्थापक अध्यक्ष मा. कॅप्टन गणपतराव घोडके यांनी व्यक्त केले.मा.कॅप्टन गणपतराव घोडके तळसंदे हातकलंगले या ठिकाणी विश्ववारणा स्कूलमध्ये मराठी विषयाच्या कृतिपत्रिका व्यवसायमाला उद्घाटनप्रसंगी बोलत होते.या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे मराठी विषयाचे प्रमुख मा. पी एस पाटील होते. या कृतीपत्रिका व्यवसायमालेच्या प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. अशोक कोकाटे यांनी केले . यावेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक डॉ.श्रीकांत पाटील म्हणाले की काळाची गरज ओळखून इयत्ता दहावी साठी तयार केलेली ही कृतीपत्रिका व्यवसायमाला सर्वस्तरातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या वेळी तज्ञ विषय शिक्षक प्रा.अशोक कोकाटे व रवींद्र आपटे यांनी तयार केलेल्या कृतीपत्रिका व्यवसायमालेचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी मा .पी. एस .पाटील प्रा.अशोक कोकाटे मा.रवींद्र आपटे व्यवस्थापक मा.दिपक महाडिक सचिव मा. डी .पी.पाटील सर यांनी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास मा.पी.आर. आंबी,मा.बाबासाहेब कदम मा.प्रशांत भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या कृतीपत्रिका व्यवसायमालेचे सुत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक मा. संभाजी पाटील यांनी केले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम