
वाढीव वीज बीलांबाबत महावितरण आणि राज्य सरकारला दणका,आठ दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे MERC चे आदेश
- by Adarsh Maharashtra
- Aug 01, 2020
- 614 views
मुंबई :राज्यात कोरोना संकट काळात महावितरणाने दिलेल्या वाढीव आणि अवास्तव वीजबीले आणि वाढवण्यात आलेल्या वीज दरांबाबत ८ दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश MERC ने राज्य सरकार आणि महावितरणला दिले आहेत. भाजप नेते किरीट सोमैया आणि आमदार निरंजन डावखरे यांनी केलेल्या याचिकेला प्रतिसाद देत वीज नियामक आयोगाने महावितरणाला खडसावले आहे.
पुढील बाबतीत स्पष्टीकरण मागितले आहे
- चुकीचे वीज बीले दिली गेली कि रिडींग चुकीचे झाले?
- लॉक़डाऊनच्या काळात कोणत्याही आर्थिक घडामोडी नसताना अवास्तव बीलं का?
याचिकाकर्ते किरीट सोमैया यांनी केलेल्या मागण्या
- कोरोना संकट काळात १०० युनिटपर्यंत मोफत वीज, आणि ३०० युनिटपर्यंत ५० टक्के सवलत
- वीज बीलांसाठी ६ महिन्यांची मुभा
- एप्रिल २०२० पासून केलेली वीज दरवाढ रद्द करा
- याचिका क्रमांक 159 of 2020 किरीट सोमैया आणि निरंजन डावखरे
पुढील आठ दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश वीज नियामक आयोगाने महावितरण आणि राज्य सरकारला नोटीसीच्या माध्यमातून दिले आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम