
ज्योतिष संस्थांचे प्रेरक मार्गदर्शक आधारस्तंभ असलेल्या गुरुवर्य श्रीकृष्ण श्रीपाद भट यांचे २५ जुलै रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन
- by Adarsh Maharashtra
- Jul 26, 2020
- 1626 views
डोंबिवली :(श्रीराम कांदू) महाराष्ट्र ज्योतिष परिषद, ज्योतिष संशोधन मंडळ डोंबिवली या संस्थांचे संस्थापक आणि महाराष्ट्रातील अनेक ज्योतिष संस्थांचे प्रेरक मार्गदर्शक आधारस्तंभ असलेल्या गुरुवर्य श्रीकृष्ण श्रीपाद भट यांचे २५ जुलै रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
१२ जून १९३३ रोजी पुण्यात जन्म झालेले श्री भटसर भारत सरकारच्या माहिती खात्यातून अधिकारी (योजना पाक्षिकाचे संपादक) म्हणून निवृत्त झाले होते. महाराष्ट्रात ज्योतिष विषयाचे औपचारिक शिक्षण एक विज्ञान म्हणून देण्यात येण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. महाराष्ट्रातील ज्योतिष संस्थांची मध्यवर्ती संघटना बांधून ज्योतिष शास्त्राची वैज्ञानिकता पटविण्यासाठी मराठी विज्ञान परिषदेच्या व्यासपीठावर जाऊन ज्योतिष शास्त्राची बाजू समर्थपणे मांडणारे भटसर हे आधुनिक काळातील महर्षीच म्हणावे लागतील. आपले वडील ज्योतिष पंडित कै श्री. के. भट यांचा वारसा समर्थपणे चालवत ज्योतिष शास्त्रावर मूलभूत चिंतन करणारे अनेक ग्रंथ त्यानी लिहिले. वैदिक कालविधानशास्त्र हा तर एकमेवाद्वितीय ग्रंथ म्हणता येईल. ज्योतिष हे पंचमहाभूतांवर आधारित पदार्थविज्ञान आहे हे त्यांनी हिरिरीने प्रतिपादन केले. त्यांच्या मागे कृषिभूषण राजेंद्र भट व सीए धनंजय भट हे चिरंजीव, स्नुषा, नातवंडे, पंतवंडे आणि महाराष्ट्रभर पसरलेले असंख्य विद्यार्थी असा परिवार आहे.ज्योतिषातील अनेक पदव्यांनी गौरविलेले गुरुवर्य ५० हून अधिक वर्षे डोंबिवलीच्या समाजजीवनाशी पण संबंधित होते आणि डोंबिवली भूषण या पुरस्काराने सन्मानित होते. शिवाय श्रृंगेरी पीठाच्या प.पू. शंकराचार्यांनी पण गुरुवर्यांना सन्मानित केले होते. ज्योतिष विज्ञानाला समर्पित ऋषितुल्य व्यक्तिमत्व हरपले. ज्योतिष संशोधन मंडळ डोंबिवलीकडून भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम