सावधान!:भारतात समूह संसर्गास सुरुवात, इंडियन मेडिकल असोसिएशनची माहिती

नवी दिल्ली, १९ जुलै :गेल्या २४ तासात कोरोनाचे ३८,९०२ नवे रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या २४ तासात ५४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत १० लाख ७७ हजार ६१८ लोकांनी कोरोनाची लागण झाली आहे. ज्यापैकी ६ लाख ७७ हजार ४२३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत २६,८१६ जणांचा मृत्यू झाला आहे.

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या माहितीनुसार, १ कोटी ३७ लाख ९१ हजार ८६९ लोकांची आतापर्यंत कोरोना टेस्ट झाली आहे. १८ जुलैला ३ लाख ५८ हजार १२७ लोकांची कोरोना टेस्ट झाली आहे.भारतातील कोरोनाबाधितांची संख्या आता साडे दहा लाखांच्या वर गेली असून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) देशातील कोरोनाच्या संसर्गाबाबत चिंताजनक माहिती दिली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे देशातील परिस्थिती बिघडली असून देशात कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झाला आहे, असे आयएमएने म्हटले आहे. दरम्यान, झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे भारत कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झालेल्या देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

आयएमए हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे चेअरपर्सन डॉ. व्ही. के. मोंगा यांनी सांगितले आहे की, ‘देशातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे, ही चिंताजनक बाब आहे. देशात दररोज ३० हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत, ही परिस्थिती वाईट आहे. आता कोरोनाचा फैलाव ग्रामीण भागातही होऊ लागला आहे.त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. हे वाईट संकेत असून देशात समूह संसर्ग झाल्याचे दिसत आहे.’ त्याचबरोबर ‘दिल्लीत आपण कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. मात्र महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा आणि मध्य प्रदेशमधील दुर्गम भागात काय होणार. कोरोना हा असा आजार आहे, जो खूप वेगाने पसरत आहे. त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारांनी पूर्णपणे सावधगिरी बाळगायला हवी आणि केंद्र सरकारची मदत घ्यायला हवी’, असेही त्यांनी म्हटले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट