
पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष म्हणतात गोमूत्र प्या कोरोनाला दूर ठेवा,
- by Adarsh Maharashtra
- Jul 19, 2020
- 920 views
कोलकत्ता: देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. रुग्णांच्या संख्येने दहा लाखांचा टप्पा पार केला असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत आणि आता देशात समूह संसर्ग सुरु झाल्याची माहिती इंडियन मेडिकल कौन्सिलने दिली आहे. याच दरम्यान भाजपच्या एका नेत्याने कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी अजब सल्ला दिला आहे. पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांनी एक विधान केलं आहे. लोकांना कोरोनापासून बचावा साठी गोमूत्र पिण्याचा सल्ला दिला आहे.
“गोमूत्र प्यायल्याने शरीराची व्हायरसशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढते” असं दिलीप घोष यांनी म्हटलं आहे. घोष यांनी एका बैठकीत लोकांना घरगुती गोष्टींचा उपयोग समजावून सांगितले आहेत. त्यावेळी त्यांनी गोमूत्र प्यायल्याने लोकांचं आरोग्य सुधारतं असा दावाही केला. तसेच गाढवं कधीही गायीची महती समजू शकणार नाहीत असं देखील म्हटलं आहे. त्यांच्या या अजब सल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
दुसरीकडे, मंगळुरुमधील उल्लाल शहरातील काँग्रेस नेता रविचंद्र गट्टी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत गट्टी यांनी करोनावरील देशी उपचार सांगितला आहे. ते म्हणतात की, रम आणि दोन तळलेली अंड्याचं सेवन केल्यास करोनाचा पराभव केला जाऊ शकतो व्हायरल व्हिडीओमध्ये रविचंद्र गट्टी करोनाला पळवण्याचं औषधं सांगत आहेत. ते म्हणतात की, ‘९० मिली रममध्ये एक चमचा काळी मिर्ची टाका. त्यानंतर त्याचं मिश्रण चांगल्या पद्धतीन करा आणि प्या. त्यासोबत दोन अंड्यांचा ऑमलेट किंवा दोन फ्राय अंडी खा.’ करोनासोबत लढण्यासठी गट्टी यांनी हा देशी फॉर्मुला सांगितला आहे. त्यांनी स्वत त्याचं सेवन केलं आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम