वसई-विरारमध्ये पुनःश्च लॉकडाऊन!आदर्श महाराष्ट्राच्या बातमीने प्रशासनाची पळापळ.

विरार:(दीपक शिरवडकर) १५जुलैच्या दै.आदर्श महाराष्ट्राच्या अंकातील बातमीनंतर वसई-विरार पालिका क्षेत्रात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून त्याची अम्मलबजावणी मात्र कडकपणे होताना दिसत नाही. त्यातच काही क्षेत्रात बांबूचे बेरिक्रेटस बांधून परिसर सिलडाऊन करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केल्याचे जाणवते.या साऱ्या गोष्टींचा कोणताच परिणाम विरार पूर्वेकडील बजार वॉर्ड ते कोपरी परिसरात जाणवत नाही.तरीही आदर्श महाराष्ट्रच्या बातमीने प्रशासन कामाला लागल्याचे दिसते.

विनाकारण टिबलसीट बसून दुचाकी हाकणारे,गुटखा खाऊन थुंकणारे, मास्क न वापरणारे,फिजिकल डिस्टिंगचा फज्जा उडवत उपद्रवीपणा करणारे,दुचाकीला पोलीस, आर्मी,पालिका असे स्टिकर लावून वाहनास नंबर प्लेट न लावता वाहने रस्त्यावर आणणारे व उपद्रवीपणा करणारे यांच्यावर भा.दं.वि.कलम १८८ अन्वये तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५,साथीचे रोग प्रतिबंधक कायदा अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अन्वये कठोर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे अशा जुजबी लॉकडाऊनचा नक्की उपयोग काय?असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे. बरेचदा दबावापोटी अधिकारी कारवाई करण्याबाबत हात आखडता घेतात अशी चर्चा आहे. आज तालुक्यात ८५४७कोरोणा रूग्ण आहेत.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट