
कोरोनाच्या संकट काळात जय जवान गोविंदा पथकाची कौतुकास्पद कामगिरी
- by Adarsh Maharashtra
- Jul 14, 2020
- 1181 views
मुंबई :कोरोनाचं सावट यंदा सगळ्याचं सणांवर आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी हा उत्सव साजरा केला जाणार नाही. ‘दहीहंडी’ हा माणुसकीचं आणि सामाजिक बांधिलकी जपायला शिकवणारा सण आहे.यंदा दहीहंडी हा सण साजरा होत नसला तरी उपनगरचा राजा म्हणून ओळखला जाणाऱ्या ‘जय जवान’ या गोविंदा पथकाने सामाजिक बांधिलकी जपणाने अनेक उपक्रम या कोरोनाच्या काळात केले आहेत.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या आदेशानुसार ट्रामा हॉस्पिटलसाठी २०० बॉटल रक्तदान सेवा पथकाकडून करण्यात आली. तसेच २५० ते ३०० गरजूंना मास्क वाटप देखील करण्यात आलं. जोगेश्वरी, नायगाव ( जूचंद्र ) मालाड मढ गाव,वर्सोवा गाव,आरे आदिवासी पाडा येथील गरजूना धान्य वाटप करण्यात आलं.
तसेच काही नियम शिथिल झाल्यानंतर जोगेश्वरी विभागातील रिक्षा चालकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी रिक्षामध्ये लावण्यात येणाऱ्या प्लास्टिकचे वाटप करण्यात आले. तर चक्रीवादळामुळे अलिबाग चौल गावात खूप झाडे कोलमळून पडली तेथे भेट देऊन साफसफाई आणि धूर फवारणी करण्यात आली.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम