मायेचा आधार माय मराठी परीवार

मुंबई(शांत्ताराम गुडेकर )संपूर्ण जगासह आपला देश देखील कोरोना कोविड - १९ महामारीच्या विळख्यात अडकला आहे. याच विळख्याचे आपल्यापैकी अनेक लोक बळी पडलेले आहेत. काही त्या  विळख्याशी लढा देत आहेत. असेच एक लढवय्ये आहेत. थोर समाजसेवक रवी बोडके. यशोधन संस्थेचे संस्थपाक रवी बोडके हे समाजातील अनाथ बेघर असणाऱ्या लोकांची संपूर्ण सेवा यशोधन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून करतात. तसेच समाजाला एक संदेश देत आहेत की, माणुसकी अजूनही जिवंत आहे. आज या संस्थेत देशातील विविध भागातील, विविध भाषिक लहानापासून थोरापर्यंत, महिला आणि पुरुष असे ३५ ते ४० अनाथ आणि बेघर लोकांचा सांभाळ केला जातो. कोरोना महामारीच्या आजाराच्या पार्श्व भूमीवर समाजातील अडीअडचणीत अडकलेल्या सर्वांनाच बोडके यांनी मदत केली, आणि त्याचाच परिणाम म्हणून यशोधन संस्थेला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा आर्थिक अडचणीत त्यांनी सामाजिक संवेदनशील, सामाजिक जाण आणि भान असणाऱ्या माय मराठी समूहाला साद घातली की, निदान एक ते दोन दिवस पुरेल एवढ्या जेवणाची सोय करता येईल का? 

 बोडके यांचा मान ठेवत माय मराठी समूहातील वैभव कदम, डॉ. केशव राजपुरे आणि सौ. वंदना या प्रत्येकांनी यथा शक्ती आपला हातभार लावला, आणि फक्त केवळ १२ तासाच्या आत समूहातील सर्वांनी मिळून ३२ हजार रुपयांची आर्थिक मदत यशोधन संस्थेसाठी जमा केली. आता पुढील दोन ते अडीच महिने पुरेल एवढा अन्न धन्याचा साठा जमा झाला आहे. महत्वाचे म्हणजे मूंबई, पुणेच नव्हे, अखंड महाराष्ट्र नव्हे तर गुजरात आणि बिहार राज्यात तैनात असलेल्या सैनिकांनी देखील यासाठी आर्थिक योगदान दिले आहे. यशोधनच नव्हे तर सैनिकांसाठी काम करणारी जयहिंद फाऊंडेशन असो, तसेच गेल्यावर्षी सांगली, कोल्हापूरला आलेला महापूर असो, झाडे लावा झाडे जगवा असो, गरजू मुलांना शैक्षणिक मदत असो, गरजू आजारी लोकांना आरोग्यासाठी मदत असो आणि आता कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर अडकलेल्या गरजूना राशन असो, या अशा अनेक ठिकाणी 'माय मराठी समूह एक' विचाराने आणि आचाराने समाजसेवा करत असतो. कारण या समूहातील प्रत्येकजण जाणतो की, राष्ट्रहाच देव आहे. या राष्ट्राचं, या समाजाचं आपण काही देणं लागतो आणि हे देणं प्रत्यक्ष कृती करून देत आपली राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रसेवेचं कर्तव्य पूर्ण करत असतो.सोशल मीडिया हा फक्त मनोरंजनाचा भाग नसून या माध्यमातून चांगल्या संवेदनशील विचारांची लोकं एकत्र आली तर समाज हिताची, समाज कल्याणाची, समाज परिवर्तनाची काम सहज करता येतात. हे या माय मराठी समूहाच्या व्हाट्स अप समूहाने करून दाखवले आहे. माय मराठी समूह हा विविध क्षेत्रातील उच्च कोटी विचारांची, सामाजिक संवेदनशील, सामाजिक जाण आणि भान असणाऱ्यांचा लोकांचा समूह आहे. इथे सामाजिक जबाबदारी असणाऱ्यांची कमी नाही. आपल्या देशावर समाजावर प्रेम करणारा हा माय मराठी समूह. हा समूह नसून एक परिवार आहे. असे मत यशोधन संस्थेचे संस्थपाक बोडक यांनी व्यक्त केले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट