राज्य शासनाच्या ठेका पद्धतीने भरतीला चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचा कडाडून विरोध

हितसंबंधांचा संशय, फक्त चतुर्थश्रेणीबाबतच दुजाभाव आश्वासनांचा विश्वासाघात, शासनाला चुकीचे सल्ले

महाराष्ट्र शासनाच्या वतीने ३६३२ आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची पदे ही सरळ सेवा भरतीने करण्यात यावी, यात  १९८१ पासून कार्यरत असलेल्या ९२२ बदली कामगारांना कायम करून तसेच अनुकंपा, वारसाहक्क याबाबतीत प्रलंबित प्रकरणांना न्याय देऊन ही भरती होणे अपेक्षित असताना बाह्यस्तोत्राद्वारे (आऊटसोर्सिंग) ठेकेदारी पद्धतीने चतुर्थश्रेणी कामगारांची पदे भरण्याचा शासनाचा निर्णय अत्यंत चुकीचा आणि अन्यायकारक आहे, याबाबत शासनाला सल्ला देणा-यांनाही योग्य ज्ञान नाही, अशी टीका करत या भरतीला राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण केली असून संघटनेने कडाडून विरोध केला आहे.

 

कोरोना संकटाच्या काळात जिवावर उदार होऊन वाहनांची व्यवस्था नसतानाही, पुरेशी आरोग्यविषयक सुरक्षा नसतानाही चतुर्थश्रेणी कर्मचारी दिवसरात्र कामावर उपस्थित होते. अनेकजण तर कामाच्याच ठिकाणी सोय नसतानाही कसाबसा जीव मुठीत ठेवून वास्तव्य करत होते. असे असतानाही त्यांना कायमस्वरुपी सेवा न देऊन शासन एकप्रकारे कंत्राटी पद्धतीने नवी भरती करून त्यांच्यावर अन्याय करत आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांना उद्धवस्त करत आहे, असेही भाऊसाहेब पठाण यांनी म्हटले आहे.

 सकारात्मक चर्चेच्या विपरित निर्णय

याचबरोबर ११ मे २०२० या दिवशी वैद्यकीय शिक्षण  संशोधन संचालनालयाचे संचालक पद्मश्री डॉतात्याराव लहाने  यांच्यासमवेत झालेल्या सकारात्मक चर्चेत संघटनेला आश्वासित करण्यात आले होतेमात्र प्रत्यक्षात तसे  झाल्यामुळे बदली कामगारवारसाहक्कअनुकंपा या यादीतील उमेदवारांचे आयुष्य त्यामुळे उद्धवस्त होणा आहेहा आमचा विश्वासघात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

 चतुर्थश्रेणी भरतीबाबतच दुजाभाव

शासन निर्णय क्रमांक संकीर्ण १०२० - प्रक्र२१ - २०२० वैसेवा -  दिनांक ११ जून २०२० या अन्वये हा निर्णय वैद्यकीय सचिव डॉसंजय मुखर्जी यांनी हा निर्णय जाहीर केला आहेत्यानुसार वैद्यकीय  दंत महाविद्यालयातील गट  मधील १०० टक्क पदे म्हणजे ३६३२ जणांना कंत्राटी पद्धतीने भरती करून घेतले जाणार आहेयातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे इतर गटातील भरती ही सरळसेवा पद्धतीने होणार आहे. मगच गट ड कर्मचा-यांच्या भरतीबाबतच दुजाभाव का, हीच भरती कंत्राटी पद्धतीने करण्यामागे कुणाचे हितसंबंध आहेत का, असा सवालही निर्माण झाला आहे.

 भरती प्रक्रियेतच मतभेद

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या विभागात आरोग्यविषयक कर्मचा-यांची पदं सरळ सेवांनी भरती करण्याचे परिपत्रक आहे. तर वैद्यकीय शिक्षण खात्याच्या विभागात ठेकेदारी पद्धतीने भरती करण्याचे निर्णय आहेत. हा काय गोंधळ आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. दोन्ही ठिकाणी काम करणारे चतुर्थश्रेणी कर्मचारी हे एक प्रकारचीच आरोग्य सेवा देणार आहे, मग हा काय प्रकार आहे, असेही बोलले जात आहे.

 नव्याने आदेश निर्गमित करावेत

राज्यातील रूग्णालयांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्याने रूग्णसेवा पुरविण्यासाठी मनुष्यबळ अपूरे पडत असून कार्यरत चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्गावर कामाचा ताण वाढत आहेत्यासाठी सर्व रूग्णालयांमधील चतुर्थश्रेणीची रिक्त पदे भरण्याबाबत  कार्यरत कर्मचा-यांच्या समस्यांबाबत त्वरित सकारात्मक निर्णय होणे गरजेचे आहेत्यामुळे हा अध्यादेश तत्काळ स्थगित करून पुन्हा नव्याने आदेश निर्गमित व्हावेतअशी मागणी भाऊसाहेब पठाण यांनी केली आहे.

 जोखीमीने काम करणा-यांना न्याय हवा

कोरोनाच्या संकटाच्या काळात बदली कामगार हे चतुर्थश्रेणी वर्गात असल्यामुळे त्यांना रूग्णालयात राहण्याची व्यवस्था नव्हतीबदलापूरअंबरनाथ आदी भागांतूनही त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले आहेअनेकांना प्रवासासाठी वाहनसेवा ऊपलब्ध नसूनही ते कर्तव्यावर हज राहिलेआरोग्याची खबरदारी घेण्यासाठी मास्कहॅण्डग्लोजसॅनिटायझर  इतर आवश्यक सोयीसूविधादेखील अनेक ठिकाणी मिळाल्या नव्हत्यातरीही जीव मुठीत धरून त्यांनी का केले आहेत्यांना कायमस्वरुपी करून न्याय मिळावाअसेही त्यांनी म्हटले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट