
महाराष्ट्राची चिंता वाढली : राज्यात ३४९३ नवे कोरोनाबाधित,१२७ मृत्यू एकूण रुग्ण आकडा १ लाखाच्या पार
- by Adarsh Maharashtra
- Jun 12, 2020
- 547 views
मुंबई १२ जून: राज्याला कोरोना व्हायरसचे हादरे सुरुच आहेत. आजही राज्यात ३४९३ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे राज्याचा एकूण आकडा १ लाख १ हजार १४१ वर गेला आहे. तर राज्यात गेल्या २४ तासांमध्ये १२७ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या ३७१७ वर गेली आहे. आजही मुंबईत सगळ्यात जास्त ९० जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात १७१८ रुग्ण बरे झाले. तर राज्यात एकूण ४७७९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ४७.३ एवढं असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
सध्या राज्यात ५ लाख ७९ हजार ५६९ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर २८ हजार २०० लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. मागील २४ तासांमध्ये १२७ करोना रुग्णांचा मृत्यूंची नोंद झाली. यामध्ये ९२ पुरुष तर ३५ महिला होत्या. आज नोंदवण्यात आलेल्या १२७ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे ६७ रुग्ण होते. तर ५२ रुग्णांचे वय हे ४० ते ५९ या वयोगटातील होते. ४० वर्षांखालील ८ रुग्ण होते. १२७ पैकी ८९ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग असे जोखमीचे आजार होते. कोविड १९ मुळे राज्यात मृत्यूंची ३७१७ इतकी झाली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम