खाजगी ग्रुह प्रकल्पाने नेरळ पुर्व भागातील नागरीक धास्तावले; शिवसेनेचा स्थानिक सदस्या आक्रमक!

कर्जत(धर्मानंद गायकवाड);- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील नेरळ पुर्व भागातील निर्माण नगरी परीसरात एक खाजगी ग्रुहप्रकल्प उभा राहात असुन या ग्रुहप्रकल्पाने येथिल स्थानिक लोकांचे आरोग्य धोक्यात आल्याने येथिल नागरीक प्रंचड धास्तावले आहेत, त्यामुळे या विभागातील स्थानिक शिवसेनेचा सदस्या सौ. जयश्री मनोज मानकामे या प्रंचड आक्रमक झाल्या असल्याचे दिसत आहे. 

दरम्यान काल सोमवारी नागरीकांचा व स्थानिक मंडळीचा तक्रारीनंतर नेरळचे सरपंच रावजी शिंगवा व अन्य सदस्यांनी येथे भेट देवुन परिस्थितीची पाहाणी केली आहे. यावेळी या ग्रुहप्रकल्पाचे साडंपाणी वाहणेचे मार्गाचे व्यवस्थापन चुकीचे करण्यात आल्याचे दिसुन आले असुन नेरळचे सरपंच व सदस्यांनी संबधित बिल्डर्सला सदर गटारे विस्तारीत करण्याचा सुचना केल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात संबधित ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केल्यास येथिल ग्रामपंचायत सदस्या सौ. जयश्री मानकामे या शिवसेना स्टाईलने हे गटार खुले करणार असल्याचे त्यांनी सांगितले असुन त्या प्रंचड  आक्रमक झाल्या आहेत.

 विशेष म्हणजे मुंबईतील नेरळ पुर्व भागात निर्माण नगरी परीसरातील काही भागात दरवर्षी पावसाळयात प्रंचड पाणी साचत असल्याचे दिसुन आले आहे. असे असतानाच आता पुन्हा येथे एका  ग्रुह प्रकल्पामुळे या परीसरातील काही भागात पावसाचे पाणी साचण्याची शक्यता वर्तविली जाते. येथे गटाराचे पाणी वाहण्याचे मार्गाचे व्यवस्थापन चुकीचे असल्याचे म्हणणे या भागातील नागरीकांचे आहे. तशी तक्रारही नेरळ पुर्व भागातील काही नागरीकांनी येथिल स्थानिक शिवसेनेचा सदस्या सौ. जयश्री मानकामे याच्याकडे केल्या आसल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले आहे. त्यामुळे काल सोमवारी ग्रामपंचायत सदस्या मानकामे यांनी याबाबत नेरळ ग्रामपंचायतीत आवाज उठविल्याने नेरळचे सरपंच रावजी शिगंवा व अन्य काही सदस्यांनी थेट येथे धडक देवुन येथिल ग्रुहप्रकल्पास पाणी वाहण्याचे व्यवस्थापन सुधारण्याचा सुचना संबधितांना केल्या आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतीचा सुचनांचे संबधित बिल्डर्स किती पालन करतो? याकडे स्थानिक नागंरीकांचे लक्ष लागुन राहीले आहे.

दरम्यान आता पावसाळा सुरु झाला असल्याने या भागातील स्थानिक रहीवाशी या ग्रुहप्रकल्पामुळे घरात पाणी शिरते की काय अशा भितीचा सावटाखाली असल्याचे येथिल नागरिकांकडुन सांगणेत आले आहे. तसेच या ग्रुहप्रकल्पाने स्थानिकांचे आरोग्य धोक्यात येणेची शक्यता असल्याचे मत येथिल ग्रामपंचायत सदस्या जयश्री मानकामे यांनी मांडुन सौ. मानकामे प्रंचड आक्रमक झाल्या आहेत. त्यातच नेरळचे सरपंच व सदस्यांनी येथे स्वःता भेट देवुन दिली आहे. त्यावेळी येथिल परिस्थितीची पाहाणी करुन संबधित ग्रुहप्रकल्प उभारीत असणाऱ्यांना गटाराचे व्यवस्थापन सुधारण्याचा सुचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथिल रहीवाश्यांना दिलासा मिळाला आसल्साचे या रगीवाश्यांनी सांगितले आहे.


रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट