
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा उद्या 'अन्नत्याग'
- by Adarsh Maharashtra
- May 25, 2020
- 813 views
मुंबई :महाराष्ट्र राज्यातील ६०००० कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक त्यांच्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे उद्या मंगळवार दिनांक २६ मे २०२० रोजी एक दिवस अन्नत्याग करीत ' आत्मक्लेष' करणार आहेत. त्यामध्ये मुंबईतील सुमारे ७००० शिक्षक सहभागी होणार आहेत. कोरोनाग्रस्त अवस्थेत राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मार्ग अवलंबला आहे. शिक्षकांच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत-
१) कनिष्ठ महाविद्यालयीन तुकड्यांना शासननिर्णयानुसार विनाविलंब २०% अनुदान वितरित करावे. शासनाने यासाठी अनुदान मंजूर केले असून केवळ वितरण आदेश काढावयाचे आहेत. याबाबत सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण झाले आहेत.
२) गेली १७-१८ वर्षे म्हणजे २००३-०४ पासून २०१८-१९ पर्यंतच्या वाढीव पदांना तसेच व्यपगत पदांना मंजुरी व वेतन द्यावे.
३) आय टी (माहिती-तंत्रज्ञान) विषय शिक्षकांना अनुदान व वेतन द्यावे.
४) २ मे २०१२ नंतर नियुक्त शिक्षकांना नियुक्ती मान्यता व वेतन द्यावे.
५) इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना यावर्षी १ली ते ८वी व महाविद्यालयीन प्रथम व द्वितीय वर्षाप्रमाणे सरसकट उत्तीर्ण करून बारावीत प्रवेश द्यावा.
६) कोरोनाग्रस्त परिस्थिती मुळे यंदा महाविद्यालये सुरू होण्यात व सुरळीत चालण्यासाठी अडथळे असल्यामुळे २०२०-२१ साठी अकरावी प्रवेशाचे अधिकार महाविद्यालयांना देण्यात यावेत ज्यायोगे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जास्त दिवस मिळतील.
७) कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना कोरोनाचे काम देऊ नये.
संघटनेने या मागण्यांच्या पूर्ततेसाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही शासन अनुकूल निर्णय घेत नसल्याने हा अन्नत्याग' मार्ग अवलंबला असल्याचे महासंघाचे समन्वयक व मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सरचिटणीस प्रा मुकुंद आंधळकर यांनी कळवले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम