
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बेस्टच्या ४ कामगारांच्या नातेवाईक बेस्ट सेवेत रुजू
- by Adarsh Maharashtra
- May 16, 2020
- 739 views
मुंबई : बेस्ट मधील कामगार जीवाची पर्वा न करता अत्यावशक सेवेत झोकून देऊन काम करत आहेत.मात्र कोरोनाने त्यांच्या गळ्याभोवती फास आवळला आहे. आतापर्यत १०७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून ७जणांचा मृत्यू झाला आहे.यातील ४ कामगारांच्या नातेवाईकांना बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे यांनी बेस्ट उपक्रमाच्या सेवेत घेण्याबाबतचे नियुक्तीचे आदेश दिले आहेत. उर्वरित कामगारांच्या वारसांना लवकरच उपक्रमाच्या सेवेत दाखल करून घेणार असल्याचे महाव्यवस्थपकांनी सांगितले.
बेस्ट उपक्रम हा अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने १०० टक्के कामगारांना कामावर उपस्थित राहण्याचे आदेश महाव्यवस्थापकांनी काढले आहेत.बेस्ट उपक्रम इतर अत्यावश्यक सेवेतील कामगार कर्मचाऱ्यांची ने आण करण्यासाठी दररोज दीड हजारहून अधिक बसगाड्या रस्त्यांवर धावत आहेत .त्यासाठी ३३०० हुन अधिक बस चालक व वाहक त्यावर काम करत आहेत. आतापर्यंत १०७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ७ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात येत आहे. उपक्रमातील कर्मचारी जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य पार पाडत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी बेस्ट प्रशासन, पालिका प्रशासन आणि राज्य सरकार घेत नसल्याचा शशांक राव यांचा आरोप आहे. कर्मचाऱ्यांची आरोग्य विषयक काळजी घेण्याबाबत ची निवेदने देऊनही ते त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. म्हणून त्यांनी सोमवारपासून सरकारच्या लॉकडाऊन बाबतचे आवाहन १०० टक्के पाळून कामगार घरीच बसणार असल्याचे म्हणजे थोडक्यात एकही बस बाहेर न काढण्याचा निर्णय १४ मे रोजी जाहीर केला आहे. मात्र इतर काही कामगार संघटनांनी शशांक राव यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी आणीबाणीच्या परिस्थितीत असा निर्णय घेणे योग्य नसून कामगारांनी कामावर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.बेस्ट महाव्यवस्थापक डॉ.सुरेंद्रकुमार बागडे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, कोविड-१९ मध्ये सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्या सर्व सुविधा पुरविण्याचे उपक्रमाचे प्रयत्न आहेत.,,अर्थात अशा उपाययोजना करूनही काही कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे.ही दुर्दैवाची बाब आहे.कोविड १९ च्या कालावधीत बेस्ट उपक्रमाच्या सेवा बजावताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना बेस्ट उपक्रच्या सेवेत सामावून घेऊन त्यांना कायम स्वरूपी आधार देण्यात येत आहे.असेही महाव्यवस्थापकांनी स्पस्ट केले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम