तळीरामांसाठी खुशखबर, आता घरपोच दारू मिळणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई - कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेता केंद्र सरकारने १७ मे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. या काळात मद्य दुकानही बंद आहेत. यातच राज्य सरकारनं मद्यप्रेमींना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. येत्या १४ तारखेपासून परवाना असलेल्या मद्य दुकानांना घरपोच दारूविक्री करता येणार आहे.

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने वाइन, बिअरची दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली होती.परंतु, या सर्व दुकानासमोर मोठी गर्दी होत असल्याने सोशल डिस्टसिंगचे पालन होत नव्हते म्हणून पोलीस विभागांवरही जबाबदारी जास्त वाढली होती. त्यामुळं अनेक जिल्ह्यांत वाइन शॉप, मद्यविक्रीची दुकानं खुली ठेवण्यास विरोध झाला होता. मात्र, आता राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क विभागानं महत्वाचा निर्णय घेतला आहे.

येत्या १४ तारखेपासून घरपोच दारू दिली जाणार आहे. पण त्यासाठी काही अटी-शर्ती ठेवल्या आहेत. कन्टेन्मेंट झोन वगळता सर्वत्र घरपोच दारू देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली आहे.

यासोबतच दारूच्या दुकानांतून घरपोच मद्य देणारा डिलिव्हरी बॉय 'फिट' आहे का, याची तपासणी आरोग्य यंत्रणेमार्फत केली जाणार असून त्यानंतरच त्याला घरपोच दारू देण्यास परवानगी दिली जाणार आहे. जे दुकानमालक उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधतील, त्यांनाच परवानगी दिली जाईल. तसेच संबंधित डिलिव्हरी बॉयला विभागाकडून ओळखपत्र दिले जाणार आहे. त्यालाच मद्याची वाहतूक करता येणार आहे.यासोबतच कन्टेन्मेंट झोनमध्ये घरपोच सेवा दिली जाणार नाही तर परवानाधारक मद्यविक्री दुकानदारांनाच घरपोच दारू देता येणार आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट