
मुंबईत आप- आपल्या गावी जाण्यासाठी पाच हजार लोक आले एकत्र,
- by Adarsh Maharashtra
- May 11, 2020
- 896 views
मुंबई : मुंबईत आप-आपल्या गावी जाण्यासाठी मुंबई सेंट्रल स्थानकावर मोठी गर्दी केली आहे. या स्थानकावर तब्बल पाच हजार लोक एकत्र आले आहेत. या परिसरात आता पोलिसांचाही मोठा बंदोबस्त करण्यात आलेला आहे. परिवहन मंत्री यांनी गावी जाण्यासाठी मोफत एसटीची घोषणा करताच ही गर्दी झालेली आहे. मात्र या गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, काल दिवसभरात एसटीने 8 हजार मजुरांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप पोहचवले. एसटी महामंडळाने आपल्या विविध आगारातील बसेसद्वारे रस्त्याने पायपीट करत चाललेल्या सुमारे 5 हजार परप्रांतीय मजुरांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत गाडीमध्ये बसवून सुखरूप राज्यांच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहोचवले आहे.
नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर नागपूर अशा विविध विभागातील सुमारे 250 एसटी बसेस द्वारे हमरस्त्यावरुन अत्यंत धोकादायक पद्धतीने पायपीट करित चाललेल्या सुमारे 5 हजार परप्रांतीय मजुरांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत गाडीमध्ये बसवून सुखरूप राज्याच्या सीमेपर्यंत जाऊन सोडण्यात आले .
त्याचबरोबर परतीच्या प्रवासात सीमेवर अडकून पडलेल्या आपल्या राज्यातील सुमारे 3 हजार मजुरांना सुखरूप त्यांच्या इच्छीत जिल्हा ठिकाणी आणण्यात आले.अशा प्रकारे कल दिवसभरात सुमारे 8 हजार मजुरांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचविण्याचे शिवधनुष्य एसटीने लिलया पेलले आहे.
भर उन्हात पायपीट करून व्याकुळ झालेल्या मजुरांना अत्यंत आपुलकीने विचारपूस करून एसटी बसेसमध्ये बसवून, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करीत राज्याच्या सीमेपर्यंत जाऊन सोडण्यात आले. काही ठिकाणी आवश्यकतेनुसार त्यांना पिण्याचे पाणी व जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली. याबद्दल या मजुरांनी एसटी महामंडळाचे व राज्य शासनाचे आभार मानले आहेत.
यापुढे देखील लाॅक-डाउन संपेपर्यंत अशाच कष्टकरी कामगार-मजुरांना सीमेपर्यंत पोहोचविण्याचे व तेथे अडकून पडलेल्या आपल्या राज्यातील मजुरांना सुखरूप घरी घेऊन येण्याची मोहिम एसटी महामंडळाच्या वतीने राबवण्यात येणार आहे. तरी कष्टकरी कामगार-मजूरांनी धोकादायक पद्धतीने पायपीट न करता तुमच्या सेवेसाठी दिवस-रात्र राबत असलेल्या एसटी बसेस मधूनच सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम