नाशिक जिल्ह्यात करोनाची रुग्णसंख्या ५७२वर; ३८ पाॅझिटिव्ह, शहरात १३ तर मालेगाव २१ रुग्ण बाधित

निफाड तालुक्यातील विंचूरमध्ये दोघे तर दिंडोरी, चांदवड इंदोरे गावातील एक रुग्ण बाधित

नाशिक (प्रतिनिधी )- नाशिक शहरात आज शुक्रवारी आणखी दहा रुग्ण वाढल्यामुळे खळबळ उडाली आहे.आज दिवसभर  प्रशासनाला प्राप्त झालेल्या ४२० अहवालात ३८ अहवाल बाधित आढळून आले आहेत. तर दोघांच्या दुसऱ्या चाचण्याही बाधित आढळल्या आहेत. यामध्ये २१ रुग्ण मालेगावमधील आहेत तर १३ रुग्ण नाशिक शहरातील आहेत. आजच्या अहवालात ग्रामीण भागातील दिंडोरीतील एक तर इतर दोघे निफाड तालुक्यातील विंचूर येथील आहेत.

आज शुक्रवारी जिल्ह्यात  ५७२ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये  ४२० निगेटिव्ह तर ३८ अहवाल बाधीत आढळून आले आहेत. शिवाय दोन बाधित रुग्णांची दुसरी तपासणीही बाधित आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील चिंता अधिकच वाढली आहे. दोन वर्षीय सातपूरमधील तर मालेगावमधील दीड वर्षीय मुलीचा आज आलेल्या अहवालात समावेश आहे. तर एका ६ वर्षाच्या मुलाचाही अहवाल मालेगावी बाधित आढळून आला आहे. वाढलेल्या आकडेवारीमुळे नाशिक जिल्ह्याची रुग्णसंख्या ५५९ वर पोहोचली आहे. यामध्ये नाशिक शहर ३९, मालेगाव शहरात ४४१ वर रुग्ण पोहोचले आहेत.

आज नाशिक शहरात आढळून आलेल्या १३ रुग्णांमध्ये ८ रुग्ण हे सातपूर कॉलनीतील आहेत. आधीच्या बाधित रुग्णाचे निकटवर्तीय असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. शहरातील नवीन सिडको, पाटील नगर, श्रीकृष्ण नगर, हिरावाडी आणि मालपाणी सफ्रोन या परिसरातील रुग्णांचा समावेश आहे.  या रुग्णांमध्ये बाधित पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीचा समावेश असल्याचे समजते. तर एका फार्मासिस्टचाही यात समावेश आहे.

आतापर्यंत नाशिक ग्रामीणमधेय ६० रुग्ण आढळून आले असून यामध्ये दोघे पूर्णपणे दोघे बरे होऊन घरी परतले आहेत. तर नाशिक मनपा क्षेत्रात ३९ रुग्ण आढळून आले असून तीन रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.मालेगाव मनपामध्ये एकूण ४४८ रुग्ण आढळून आलेल असून यामध्ये ४५ पूर्णपणे बरे झाले आहेत. तर आतापर्यंत जिल्हा बाहेरील १९ रुग्णांवर जिल्ह्यातील वेगवेगळ्या दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट