
कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना खरीप कर्जासाठी जुलैची प्रतीक्षा
■ 31 मार्चपूर्वी कर्ज न भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही जुलैमध्येच कर्ज
- by Adarsh Maharashtra
- May 08, 2020
- 1484 views
पालघर (जयेश शेलार) येत्या जूनमध्ये सुरू होणाऱ्या शेती हंगामाच्या पार्श्वभूमीवर ठाणे-पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामाच्या पीक कर्ज वाटपाला सुरुवात झाली आहे, मात्र राज्य सरकारने कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जासाठी जुलैची वाट पाहावी लागणार आहे तर 31 मार्च पूर्वी पीक कर्ज न भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही 30 जूननंतरच खरीप कर्ज मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी शेती कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
जूनमध्ये शेतीचा खरीप हंगाम सुरू होत असून ठाणे-पालघर जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी शेतीच्या कामासाठी शेती कर्ज घेत असतात. मात्र यावर्षी झालेला ओला दुष्काळ व त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेला लॉक डाऊन यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना 31 मार्चपूर्वी मागील वर्षीचे पीक कर्ज भरणे शक्य झालेले नाही. तर कधी ओला तर कधी सुक्या दुष्काळामुळे गेली अनेक वर्षे पीक थकीत राहिलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी राज्य सरकारने कर्ज माफी दिल्याने थकीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र तलाठी व अन्य शासकीय कार्यालये सध्या सुरू नसल्याने नवीन पीक कर्जासाठी आवश्यक असणारे घोषणपत्र व अन्य औपचारिकता पूर्ण होऊ शकत नसल्याने कर्ज माफी मिळालेल्या शेतकऱ्यांनाही नवीन पीक कर्जासाठी जुलै महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.
दरम्यान जिल्हा बँकेकडून विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या माध्यमातून नियमित कर्जदार शेतकऱ्यांना एप्रिल-मेमध्ये पीक कर्ज वाटप सुरू असले 31 मार्चला संपणाऱ्या आर्थिक वर्षाला 30 जून पर्यंत मुदतवाढ मिळाल्याने तरी 31 मार्चपर्यंत थकीत व कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी 30 जूननंतरच मंजूर होणार असल्याचे समजते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम