मुंबई बंदरातील पहिल्या कामगार संघटनेला शंभर वर्ष पूर्ण

मुंबई :भारतात इंग्रज राजवटीच्या काळात भारतीय कामगार चळवळीचे पितामह कै. ना.म. जोशी यांच्या आशीर्वादाने एक थोर समाजसुधारक कै. एस. एच. झाबवला यांनी वर्कशॉपमधील कसबी कामगार कै. सदानंद गडकर व मेकॅनिकल इंजिनिअरिंग सेक्शनमधील जहाजातून मालाची चढउतार करणारे क्रेन ड्रायव्हर्स व त्यांचे इतर सहकारी यांच्या सक्रिय पाठिंब्यामुळे 3 मे 1920 रोजी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनची स्थापना करण्यात आली. या ऐतिहासिक कामगार संघटनेला 3 मे 2020 रोजी 100 वर्षे पूर्ण होऊन तिचा शतक महोत्सव साजरा होणार होता, परंतु कोव्हीड 19 मुळे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम होणार नाहीत.

अशोक मेहता, डॉ. शांती पटेल अशा दिग्गज नेत्यांनी या संघटनेचे नेतृत्व केले. त्यानंतर ऍड. एस. के. शेट्ये यांनी अध्यक्षपदाची तर सुधाकर अपराज यांनी जनरल सेक्रेटरी पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे.आणीबाणीच्या काळात आंदोलनाद्वारे विरोध केल्यामुळे डॉ. शांती पटेल, ऍड. एस. के. शेट्ये, युनियनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते अशा 23 जणांना नाशिकच्या जेलमध्ये मिसाखाली अटक करण्यात आली.  आणीबाणी उठल्यानंतर सर्वांची सुटका झाली. कामगारांचे प्रबोधन व्हावे म्हणून युनियनतर्फे " पोर्ट ट्रस्ट कामगार" हे मुखपत्र काढले जाते. गेली 23 वर्षे पोर्ट ट्रस्ट कामगार दिवाळी विशेषांक काढला जातो.युनियनची कंझुमर्स सोसायटी, पतपेढी,हौसिंग सोसायटी आहे. कामगारांच्या कुटुंबाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून युनियनतर्फे कौटुंबिक स्नेहसंमेलन, विद्यार्थ्यांचा गुणगौरव, कामगार कलाकार, खेळाडू यांचा गुणगौरव इत्यादी विविध उपक्रम संघटनेच्या वतीने राबविले जातात. मुंबईत माझगाव व गुरातमध्ये अलंग येथे जहाज तोडणी कामगारांना संघटित करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉ.शांती पटेल यांच्या आशीर्वादाने अलंग येथे जहाज उद्योगातील  कामगारांसाठी जगातील पहिली कामगार संघटना स्थापन करण्यात आली. या संघटनेचे अध्यक्ष ऍड. एस . के. शेट्ये असून जनरल सेक्रेटरी विद्याधर राणे आहेत. मुंबई बंदराच्या उभारणीत व या बंदराला नावारूपाला आणण्यात गोदी कामगारांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. कष्ट करून मुंबई बंदराला वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवले आहे. गोदी कामगारांनी व गिरणी कामगारांनी मुंबई बंदराचे संरक्षण केले आहे. तेव्हा मुंबई बंदराचा विकास करतांना मुंबई शहराचे व गोदीचे संरक्षण करणाऱ्या  गोदी कामगारांना घरे मिळाली पाहिजेत यासाठी युनियन मार्फत सर्व संघटनांच्या सहकार्याने सतत प्रयत्न चालू आहेत. 

कोरोना संकटप्रसंगी मुंबई बंदरातील  अत्यावश्यक सेवेत काम करणारे डॉक्टर, नर्सेस, स्टाफ, कामगार यांना 50 लाख विम्याचा फायदा व इतर सुविधा युनियनने मिळवून दिल्या आहेत. पोर्ट ट्रस्टचे कामगार व सेवानिवृत्त कामगार याना सुख सुविधा मिळून देण्यासाठी युनियनचे अध्यक्ष ऍड. एस. के. शेट्ये, जनरल सेक्रेटरी व मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज सतत प्रयत्नशील असतात. युनियनच्या शताब्दीवर्ष पुर्ततेबद्दल सर्व सभासद, पेन्शनर, सेवानिवृत्त कामगार, कार्यकर्ते, पदाधिकारी यांना युनियनच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट