
क्वॉरोनटाईन ठेवण्यात आलेल्या रुग्णांना पोटभर जेवण मिळत नसल्याने उपासमार
- by Adarsh Maharashtra
- Apr 23, 2020
- 1134 views
मुंबई :( जीवन तांबे )कोरोनाने देशभर थैमान घातले असल्याने मुंबईत मोठया प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. मात्र क्वॉरोनटाईन ठेवण्यात येत असलेल्या रुग्णांना दोन वेळचे जेवण पोटभर मिळत नसल्याने त्याना उपाशी रहाण्याची वेळ येत आहे.
मुंबईतील उपनगरात पी.एल लोखंडे मार्गावरील महात्मा फुले नगर, नागेवाडी, सिध्दार्थ रिसिडनसी, मुकुंद नगर मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. तर एन .जी आचार्य मार्गावरील आनंद नगर झोपडपट्टीत राहणारी परिचारिका तिच्या कुटुंबातील दोघाना तसेच घाटला गावात राहाणारे दोन पोलीस कर्मचाऱ्यांची काल कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आले आहेत. या झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. एम पश्चिम विभागात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णाची संख्या 104 वर गेली आहे. या मधील काही कोरोना बाधित रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरी त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणें दिसत नसल्याने पालिका आरोग्य विभागाने अशा रुग्णांना व संशयिताना चेंबूर येथील जॉय रुग्णालय, निलकमल हॉटेल, आचार्य नगर एसआरए इमारतीतील क्वॉरोनटाईन कक्षात ठेवले आहे.
पालिका या रुग्णाची प्रतिकार शक्ती वाढवण्या करिता पोषक आहार देते. सकाळी चहा, सकाळी नास्ता दोन वेळचे जेवण देण्यात येते.
काही दिवसांपूर्वी क्वॉरोटाईन रुग्णाना कधी कधी निकृष्ट जेवण येत होते. पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नव्हते. त्यामुळे काहींनी प्रसार माध्यमाकडे तक्रार केली होती. याबाबत वैद्यकीय अधिकारी यांच्या कडे विचाराणा केल्यावर त्यांनी काही रुग्णांच्या तक्रार आल्या होत्या. मी लगेच जेवण बनवणाऱ्यांना जेवणात बदल करायला लावले आहे. तसेच पिण्यास बिसलेरी देण्यास सांगितले आहे. आता त्याना चांगले दर्जाचे जेवण देण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले.
मात्र पालिकेकडून हे जेवण देण्यात येत असले तरी फक्त एकच पॉकेट देण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णाचे पोट भरत नसल्याने त्यांना अर्धपोटी उपाशी रहावे लागत आहे.
काल तर आचार्य नगर एसआरए इमारतीतील चौथ्यां व पाचव्या मजल्यावर क्वॉरोटाईन रुग्णांना जेवण, चहा देण्यात आला नाही. कोणतीही लक्षणे दिसत नसताही काहीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अशा रुग्णांना क्वॉरोनटाइन ठेवले जाते. त्याना पालिका पौष्टिक आहार देते. या आहारामुळे रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि तो लवकर बरा होतो.
मात्र काहीना रुग्णांनापर्यंत जेवण, चहा, नास्ता पोहचला जात नाही. जेवण दिले जाते. परन्तु फक्त एका रुग्णाला एक पॉकेट त्यामुळे कित्येकांचे पोटच भरत नाही. त्यांना अर्ध पोटी रहावे लागत आहे. तर काहींना उपाशी रहाण्याची वेळ येत आहे.
पालिका दोन वेळचे जेवण देते. नास्ता, चहा दिला नाही तरी चालेल पंरतु जे दोन वेळचे जेवण देते ते तरी पोटभर द्या अशी मागणी क्वॉरोनटाईन रुग्णांनी केली आहे.
प्रतिक्रिया- डॉ.भुपेंद्र पाटील वैद्यकीय आधिकारी, एम पश्चिम विभाग,
जेवण चांगले आणि पुरेसे देण्यात येते. काल काही क्वॉरोटाईन यांनी दोन दोन जेवणाची पॉकेट घेतली असल्याने पाच सहा जणांना जेवण मिळाले नाही.
याबाबत आमच्या कर्मचारी यांनी माहिती दिली. त्यांना जेवण देण्यात आले आहे.सर्वांनाच आम्ही चांगली सेवा देत आहोत
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम