
लोकांच्या मागणीनुसार, ‘सब की रसोई’ आता 33 शहरांमध्ये सक्रिय आहे.
- by Adarsh Maharashtra
- Apr 14, 2020
- 464 views
मुंबई (जीवन तांबे )काळाची गरज पाहता 'सब की रसोई'ने गरजू लोकांना जेवण देण्याच्या उद्देशाने आपला विस्तार २०+ शहरांवरून 33 शहरांमध्ये वाढवला आहे. सुरुवातीला दररोज १.५० लाख लोकांना जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, ‘सब की रासोई’ उपक्रमांतर्गत ६९००८६९००८ या हेल्पलाइन क्रमांकावर मोठ्या संख्येने प्राप्त झालेले फोन कॉल पाहता लाभार्थ्यांची संख्या १.८० लाख करण्यात आली आहे.
आय-पॅकने फक्त 7 दिवसात 10 लाख लोकांना जेवण दिले आहे. गेल्या आठ दिवसांत देशातील 33 शहरांमध्ये ११.९४ लाख लोकांना अन्न पुरविण्यात आले. पटणा देखील अशाच शहरांपैकी एक आहे जिथे या उपक्रमातून ४१,०००+ गरजू लोकांना मदत केली आहे.
आय-पॅकने आपला ‘सब की रासोई’ हा उपक्रम ५ एप्रिल रोजी सुरू केला. उपक्रमाचे उद्दिष्ट हे १० दिवसात (१४ एप्रिल पर्यंत) १५ लाख गरजूंना ताजे जेवण (दररोज १.५ लाख) देण्याचे होते.
या उपक्रमाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी किंवा सहभागी होण्यासाठी, कृपया आमच्याशी संपर्क साधा. आपण आम्हाला info.sabkirasoi@indianpac.com वर ईमेल पाठवू शकता किंवा ६९००८६९००८ वर कॉल करू शकता
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम