चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्वच्छ झालेला पुतळा त्याच्या जयतिनिमित पालिकेने स्वच्छ केला नसल्याने आंबेडकरी अनुयायी संतप्त. !

मुंबई :  ( जीवन तांबे )चेंबूर येथील चेंबूर रेल्वे स्थानकासमोर असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा त्याच्या जयंती निमित्त पालिकेने स्वच्छ केला नसल्याने पालिका सहाय्यक आयुक्त यांच्यावर तमाम आंबेडकरी अनुयायांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

चेंबूर परिसरात मोठ्या प्रमाणात आंबेडकर आनुयायी असल्याने त्याच्या मागणी नुसार पालिकेने  पालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा १ मे १९७६ रोजी उभा करण्यात आला होता. या पुतळ्याचे अनावरण तेव्हाचे सेनेचे महापौर मनोहर जोशी यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष भैया साहेब आंबेडकर होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची जयंती, महापरिनिर्वाण दिना निमित्त मुंबईचे महापौर व  आंबेडकर अनुयायी त्याच्या पुतळ्याला मानवंदना करायला आज ही मोठ्या संख्यने येत असतात. 

या उद्यानाचे सुशाभिकरण व पुतळ्याची स्वच्छता, उद्यानाला रोषणाई पालिका एम पश्चिमचे सहाययक आयुक्त याच्या अधिपत्या खाली केले जाते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी दरवर्षी जयंती धुमधडाक्यात साजरी करीत असतात परन्तु यावर्षी कोरोनाने देशभर थैमान घातले आहे. सरकारने मुंबईत लॉकडाऊन, संचार व जमाव बंदी लावली असल्याने तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरी साजरी करा असा आदेशच शासनाचे आहेत.कोणीही डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आबेडकर अनुयायी आलेत नाहीत. परन्तु डॉ. बाबासाहेब आंबेडकर पालिका आंबेडकर यांच्या जयंतीला व महापरिनिर्वाण, उद्यानाला रोषणाईचा खर्च पालिकाच करते परंतु या वर्षी अस्वच्छ झालेला पुतळा पालिका एम पश्चिम सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चौहान यांनी कामगाराकडून करून घेतला  नसल्याने तमाम आंबेडकर जनता संताप व्यक्त करीत आहे. 

एम पश्चिम सहाय्यक आयुक्त हे जाणून बुजून दुजाभाव करीत असून त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो त्यांना या विभागातून तत्काळ निलंबित  करावे अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान समनव्यक समितीचे अध्यक्ष कैलास आरवडे यांनी केला आहे

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट