
बीकेसी मध्ये महायुतीचे शक्तिप्रदर्शन: आम्ही थकत नाही,वाकत नाही आणि झुकत ही नाही- पंतप्रधान
- by Adarsh Maharashtra
- Oct 18, 2019
- 1241 views
महाराष्ट्रात सध्या सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या विश्वसनीय सरकारचा काळ आहे. जे ७० वर्षात विरोधकांना जमले नाही ते फडणवीस सरकारने ५ वर्षात करून दाखवले कारण आम्ही थकत नाही,वाकत नाही आणि झुकत ही नाही. आमच्या सत्ता काळात मुंबईत कधी दंगे झाले नाहीत, बॉंबस्फोट झाले नाहीत, आम्ही देशाला आणि मुंबईला सुरक्षित ठेवले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीकेसी येथील महायुतीच्या सभेत बोलताना सांगितले.
महायुतीच्या कालच्या बीकेसी येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. त्यांनी काँग्रेस वर हल्ला करताना सांगितले की सुशीलकुमार शिंदे म्हणतात आम्ही थकलोय, होय ते खाऊन खाऊन थकलेत. आता न खाणाऱ्यांच्या हाती सत्ता आहे. काँग्रेसने स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता तेंव्हा काँग्रेसमध्ये असे नेते होते ज्यांच्या समोर आदराने मान झुकायची. आताच्या काँग्रेस नेत्यांनी शरमेने मान खाली घालायला लावली. पूर्वी त्यांच्याकडे विचार होता आता विकार आहे.
पंतप्रधान मोदी यांनी सुरवातीलाच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे देशाच्या विकासात फार मोठे योगदान असल्याचे सांगितले. मात्र पूर्वीच्या सरकारांचे सर्व लक्ष फक्त मंत्रालयाकडे असायचे. कोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागतेय, कोण मुख्यमंत्री होतोय याकडे लक्ष असायचे. त्यामुळे ते ७० वर्षात महाराष्ट्रासाठी काही करू शकले नाही. पण त्यानंतर मुंबईकरांनी स्थैर्याला निवडले आणि त्यांना ५ वर्षात बदल दिसू लागला. काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी महाराष्ट्रात घोटाळ्याचे सिंचन केले. त्यांच्या सत्ता काळात मुंबई कधीच सुरक्षित नव्हती. मुंबईत दंगली झाल्या, बॉंबस्फोट झाले, दहशतवादी मुंबईत घुसले पण काँग्रेस सरकारमधले लोक दहशतवाद्यांबाबत ठोस भूमिका घेऊ शकते नाहीत. दहशतवादाचा बंदोबस्त करू शकले नाहीत. उलट माफियांच्या साथीदारांसोबत त्यांनी मिरचीचा व्यापार केला. आज मुंबई सुरक्षित आहे. इथल्या गुंडगिरीला, बिल्डरांच्या मनमानीला आमच्या सरकारने चाप लावला आणि महाराष्ट्रात एक सक्षम सरकार दिले. आम्ही कधीच परिवारवाद केला नाही कारण हा देश म्हणजे आमचे कुटुंब आहे. देशाला सुरक्षित करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक केला. कलाम ३७० रद्द केले म्हणूनच देश सुरक्षित ठेवणाऱ्याच्या हातीच सत्ता द्या असे त्यांनी शेवटी आवाहन केले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम