आपल्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या लोकांना जर कोणी नक्षलवादाची उपमा देत असेल तर त्या नक्षलवादयांचे नेतृत्व मी करेन - खासदार उदयन भोसले

सातारा - आपल्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या लोकांना जर कोणी नक्षलवादाची उपमा देत असेल तर त्यांचे नेतृत्व करायला मी कमी पडणार नाही असे खळबळजनक विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. खटाव तालुक्यातील जनतेने दुष्काळी प्रश्नावरून वडूज तहसिलदारांना निवेदन दिले. त्यावेळी आंदोलकांशी संवाद साधताना खासदार उदयनराजे बोलत होते. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून सातारा जिल्ह्यातील खटाव हा कायम दुष्काळी तालुका वगळण्यात आला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या जनतेने उद्या (लक्ष्मीपुजन) काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील निवेदन आज खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना वडूज येथील तहसिलदार कार्यालयासमोर देण्यात आले. खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, जर आपली मुले उपाशी असतील तर माणूस करणार काय तो दुसऱ्याच्या ताटातील हिसकावूनच घेणार. त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. सरकारने यात बारकाईने लक्ष दिले नाही तर मोठ्या प्रमाणात नक्षलवादी तयारी होतील. पोलिस, प्रशासनाकडे गेल्यावर न्याय मिळत नसेल तर ते न्याय हक्कासाठी भांडणारच. संपुर्ण राज्यकर्ते व प्रशासनाला माझी विनंती आहे तुम्ही नक्षलवादी होण्यासाठी लोकांना प्रवृत्त करु नका एकदा जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर कोणीच थांबवू शकणार नाही. 




रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट