सावध व्हा!राजधानी दिल्लीत कोरोना संक्रमणाची तिसरी लाट

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वाढत्या कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजधानीत कोरोनाची तिसरी लाट सुरू असल्याचा खुलासा केला आहे. याचं कारण म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत अचानक संक्रमित रुग्णांच्या संख्येत लक्षणित वाढ झाल्याचं दिसून आलं. दिल्ली सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी ५९,५४० नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील ६ हजार ७२५ नमुने करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. म्हणजेच जवळपास तब्बल ११.२९ टक्के नमुने करोना संक्रमित आढळले आहेत.यामुळे आरोग्य क्षेत्रावरचा ताण वाढणार असल्याचं दिसतंय.

दिल्लीतील उपचार सुरु असलेल्या ६ हजार ७९८ रुग्ण वेगवेगळ्या रुग्णांलयात भर्ती आहेत. ९७३ रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये तर ३५८ रुग्ण कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. तसंच २१ हजार ५२१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

राजधानी दिल्लीत दिवसेंदिवस तपमान कमी होताना दिसतंय.त्यातच सर्दी-खोकल्याच्या आजारासोबतच कोविड संक्रमित रुग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसतेय. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत दररोज जवळपास ५ हजारांच्या संख्येत रुग्ण आढळत आहेत. येणाऱ्या काही दिवसांत ही संख्या १२ हजारांपर्यंत पोहचू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जातेय.राजधानी दिल्लीत आत्तापर्यंत एकूण ३ लाख ६० हजार ०६९ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केलीय तर एकूण ६ हजार ६५२ जणांनी कोरोनासमोर हात टेकले.

दिल्लीत कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडूनही प्रयत्न केले जात आहेत. दिल्ली सरकारनं खासगी रुग्णालयांसोबत हात मिळवणी करत कोविड नियंत्रणावर काम करण्यास सुरुवात केलीय.कोविड संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानं बेड आणि व्हेन्टिलेटरची मागणी वाढलीय.उल्लेखनीय म्हणजे, दिल्लीत अद्यापही १५ हजार ७८० कोविड रिझर्व्ह बेड आहेत. जवळपास १३२ रुग्णालयांत कोविड उपचार सुरू आहेत. यामध्ये खासगी रुग्णालयांची संख्या मोठी आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट