विरार-इमारतींचा पुर्नविकास व पुर्नवसन धोक्यात

 विरार(दीपक शिरवडकर) : काही जमिनमालक व विकासकानी हातमिळवणी करत बेकायदापणे इमारती उभारून ग्राहकांची फसवणूक केली असल्याने भविष्यात अशा इमारतींच्या पुर्नविकास व पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?याकरता राज्य शासनाने भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्यांचा आतापासूनच साकल्याने विचार करून "राहिल त्याचे घर तत्वाने"अशा इमारती इमारतीखालील जागेसह मानवी अभिहस्तांतरण करून अधिकृत करण्याचा निर्णय घेणे काळाची गरज आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील अंदाजे १८० इमारती कधीही कोसळू शकतात,तर ५६३ इमारती धोकादायक असल्याची नोंद आहे.तर उपनिबंधक,सहकारी संस्था,वसई कार्यालयाकडून सन २०१८ पर्यंत अंदाजे ६०२८ गृहनिर्माण सोसायटया नोंद करून दिल्या गेल्या आहेत. यापैकी बोगस व खोटया कागदपत्राने,बेकायदा बांधकामाच्या ठिकाणी,कामात बेजबाबदारपणा दाखवत संशयास्पदरित्या किती हौसिंग सोसायटयांची नोंदणी झाली आहे. याचा थांगपत्ता राज्याच्या सहकार मंत्र्यांनाही नाही. त्यामुळे ह्या गंभीर समस्येची राज्य शासनाने वेळीच दखल घेऊन भविष्यात निर्माण होणाऱ्या इमारतीच्या पुर्नविकास व पुर्नसनाबाबतचा आराखडा तयार करून जमिनमालक व विकासक तसेच प्रशासकीय यंत्रणा यांच्याकडून फसवणूक झालेल्या सदनिकाधारकांना न्याय द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट