शहापूरला कोरोनाने घेरले ३९ व्यक्ती कोरोना बाधित,५ रुग्णाचा मृत्यू

शहापूर (महेश धानके) ठाणे जिल्ह्यातील एकमेव आदिवासी तालुका असलेल्या शहापूर तालुक्याला कोरोनाने चांगलेच घेरले असून आज  ३९ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे,धक्कादायक बाब म्हणजे काल  ४ व्यक्तींना आपला कोरोनात जीव गमवावा लागला होता तर आज पुन्हा ५ व्यक्ती कोरोना मध्ये मृत्यू पावल्या आहेत

दोन दिवसात झालेले ९ मृत्यू हा तालुक्याच्या चिंतेचा विषय झाला असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने कठोर पावले उचलण्याची गरज आहे

तालुक्यातील वाशिंद शहरात तर रोजच रुग्ण वाढत असून तालुक्यातील सर्वात मोठा हॉटस्पॉट म्हणून वाशिंद शहराचे नाव पुढे येत आहे,आजही सर्वात जास्त रुग्णांची नोंद ही वाशिंद शहरात झाली आहे

तालुका आरोग्य अधिकारी डॉ तरुलता धानके यांनी दैनिक आदर्श महाराष्ट्र ला दिलेल्या  आजच्या अहवालानुसार  तालुक्यातील एकूण बाधित संख्या १७६७असून आतापर्यंत १३२१ लोकांनी कोरोनावर मात केली आहे,६५ रुग्ण मृत्यू पावले असून ३८१ रुग्ण सध्या विविध ठिकाणी उपचार घेत आहेत,तर कॉरंटाईन व होम कॉरंटाईन व्यक्तींची संख्या ११२७३आहे,

संबंधित पोस्ट