विरार आरटीओ भ्रष्ट अधिकारी आणि दलालांच्या विळख्यात

दलालांचे आश्रयदाते बनलेल्या भ्रष्ट अधिकारी कुमठेकर यांना निलंबित करण्याची मागणी

विरार(प्रतिनिधी): परिवहन खात्याचा कोणत्याही प्रकारचा वचक नसल्याने सध्या आरटीओ कार्यालये ही तिथले भ्रष्ट अधिकारी आणि दलालांच्या विळख्यात अडकलेली आहे आणि त्याचे दुष्परिणाम वाहन चालक आणि वाहन प्रशिक्षण संस्था यांना भोगावे लागत आहेत. विरार आरटीओ कार्यालयात संगणक प्रणाली प्रशासक श्रीकांत कुमठेकर या अधिकाऱ्याने सॉल्ट बुकिंग देताना त्याच्याशी आर्थिक साटेलोटे असलेल्या काही दलालांना आणि दोन तीन वाहन प्रशिक्षक संस्थानांच फायदा करून दिला. विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशी शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून त्याने हे कृत्य केले असा आरोप पालघर जिल्हा वाहन प्रशिक्षण संघटनेच्या अध्यक्षा सौ.भारती पाटील यांनी केला असून या प्रकरणी त्यांनी अतिरिक्त परिवहन आयुक्तांकडे कुमठेकर याची रीतसर तक्रार केल्यानंतर त्यांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांना चौकशीचे आदेश दिले होते मात्र अनिल पाटील हे स्वतःच भ्रष्ट असल्याने मांजराला उंदराची साक्ष या म्हणी प्रमाणे त्यांनी कुमठेकर यांची चौकशी करण्या ऐवजी त्यांना पाठीशी घातले आणि केवळ कुमठेकर यांनी केलेल्या चुकीच्या आणि तद्दन खोट्या खुलाशावर त्यांना क्लिनचीट दिली त्यामुळे कुमठेकर अजूनही विरार आरटीओ मध्येच सक्रिय आहेत आणि एखाद्या माणसाला एक गुन्हा पचला की त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि मग तो पुन्हा पुन्हा तसेच गुन्हे करीत राहतो आणि त्याच्या या दुष्कृत्यांचा त्रास सर्व सामान्य जनतेला भोगावा लागतो. विरार आरटीओ मध्ये सुद्धा तसेच घडत आहे. कुमठेकरला त्याच्या वरिष्ठांनी त्यावेळी वाचवल्यामुळे त्याने पुन्हा आरटीओ दलालांना आणि काही ठराविकच वाहन प्रशिक्षण संस्थांना फायदा होईल अशा पद्धतीने सॉल्ट बुकिंग द्यायला सुरुवात केली आहे त्यामुळे जानेवारी पासून पैसे भरून प्रतीक्षेत असलेल्या लोकांना लायसेन्स मिळालेली नाहीत. त्यामुळे आता पालघर जिल्ह्यातील सर्व वाहन प्रशिक्षण संस्था सौ. भारती पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आल्या आहेत. गुरुवारी या सर्वांनी विरार आरटीओ कार्यालयात धडक देऊन नवीन असलेले परिवहन अधिकारी वरुडे यांना जाब विचारला आणि श्रीकांत कुमठेकर यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली. यावेळी सौ. भारती पाटील यांनी परिवहन प्रशिक्षण संस्थांच्या मागणीचे एक निवेदन विरार आरटीओ कार्यालयास सादर केले त्यात एकूण ११ मागण्या करण्यात आल्या आहेत यामध्ये सर्व शिबिरे पूर्वस्तरीय कामकाज पद्धतीने चालू करावीत ( सर्व कामे ऑफ लाईन पद्धतीने), रिनिवल लायसन्स ऑफ लाईन मध्ये स्वीकारावे, लर्निंग आणि पक्क्या लायसन्ससाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी नोटीस फलकावर लावण्यात यावी, री टेस्ट वे  व इंडोसमेंट क्लास ऑफ लाईन मध्ये घेण्यात यावेत, स्लॉट ओपन करण्याचा टायमिंग हा कार्यालयाच्या वेळेतच सुरू करण्यात यावा, कंत्राटी कामगारांना तात्काळ काढून टाकण्यात यावे, व्हिजिटर बुक आणि कंप्लेंट बुक बाहेर ठेवण्यात यावे, सीसीटिव्ही कॅमेरे सर्व विभागात चालू ठेवावेत, शिबिरे व कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांच्या कामाच्या वेळेची सूचना बाहेर फलकावर लावण्यात यावी , कार्यालयाचा प्रदर्शन फलक तात्काळ लावण्यात यावा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संगणक प्रणाली प्रशासक कुमठेकर याचीही पूर्वीसारखाच गुन्हा करण्याची दुसरी वेळ असल्याने यावेळी त्याला तत्काळ निलंबित करावे. तसेच मागच्या वेळेस त्याला कोणी व कसे वाचवले त्या अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी करावी अन्यथा या प्रकरणी ज्या वाहन प्रशिक्षक संस्था आणि लायसन्स मिळण्यास पात्र असूनही अजून लायसन्स न मिळालेले वाहन चालक विरार आरटीओच्या विरोधात परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे संपूर्ण वसई प्रादेशिक परिवहन विभागाच्या चौकशीची मागणी करतील आणि वेळ पडल्यास या अन्यायाच्या विरोधात न्यायालयाचा दरवाजाही ठोठावतील असा इशारा सौ. भारती पाटील यांनी दिला आहे. सौ. भारती पाटील या पालघर जिल्ह्यातील एक लढाऊ सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात त्या विश्व मानवाधिकार सुरक्षा महासंघाच्या जिल्हा अध्यक्ष तसेच केंद्रीय सतर्कता आयोगाच्या सदस्य आहेत शिवाय सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या पालघर जिल्हा अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील परिवहन प्रशिक्षण संस्थांनी आरटीओ तील भ्रष्ट अधिकारी लोकांविरुद्ध सुरू केलेला हा लढा नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट