कल्याणच्या हाणामारी प्रकरणाला कलाटणी तक्रारदार नगरसेवकाची लॉकअपमध्ये रवानगी

पोलिस ठाण्यात राडा करणाऱ्या आमदारावरही गुन्हा दाखल

डोंबिवली :(श्रीराम कांदूू)  कल्याणमधील जागेच्या वादातून झालेल्या हाणामारीच्या प्रकरणाला शनिवारी कलाटणी मिळाली आहे. विरोधकांनी केलेल्या मारहाणीच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेल्या भाजपा नगरसेवक मनोज राय यांना पोलिसांनी लॉकअपमध्ये टाकले. हा प्रकार कळताच त्याठिकाणी भाजप आमदार गणपत गायकवाड हे जाब विचारण्यासाठी गेले आणि त्यांनी वरिष्ठ पोलिस निरिक्षक शाहूराज साळवे यांना चांगलेच फैलावर घेतले. मात्र दुसऱ्यादिवशी शनिवारी या प्रकरणाला कलाटणी मिळाली आणि पोलिस ठाण्यात जाऊन गोंधळ घातल्याच्या आरोपाखाली आमदार गायकवाड यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

व्यवयासाने बिल्डर असलेल्या नगरसेवक राय यांचा एका जागेवरुन काही लोकांशी वाद सुरु आहे. या वादाचे रुपांतर शुक्रवारी दुपारी हाणामारीत झाले. राय हे त्यांच्या कार्यकर्त्यां सोबत कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. मात्र पोलिसांनी राय यांच्या विरोधात गुन्हा दाखल नसताना व तक्रार न घेताच दोन कार्यकर्त्यांसह त्यांना लॉकअप मध्ये टाकले. हा प्रकार कळताच भाजपाचे स्थानिक आमदार गायकवाड हे पोलिस ठाण्यात पोहोचले. आमदारांनी पोलिस ठाणे डोक्यावर घेऊन तेथिल वरिष्ठ पोलिस निरिक्षक शाहूराज साळवे यांना चांगलेच सुनावले. आमदारांचे रौद्ररूप पाहून साळवे यांनी मौन धारण केले. आमदार गायकवाड पोलिस ठाण्यातून निघून गेल्यानंतर पोलिसांनी मनोज राय यांच्यासह त्यांच्या विरोधकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तर राय यांच्या विरोधात गजानन म्हात्रे यांच्यासह त्यांच्या साथीदारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. तर राय यांच्या तक्रारीवरुन गजानन म्हात्रेसह अन्य काही जणांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात केला. आमदार गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात येऊन गर्दी जमविली. तसेच त्यांनी मास्कही परिधान केला नव्हता. त्यामुळे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमविल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी आमदार गायकवाड यांच्याही विरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांना कोर्टात खेचणार : या संदर्भात आमदार गायकवाड यांनी सांगितले की, मी एकटाच त्या ठिकाणी जाब विचारण्यासाठी गेलो होतो. एखाद्या प्रकरणी जाब विचारणो चुकीचे असेल आणि माझ्या विरोधात जो गुन्हा दाखल झाला आहे त्याविरोधात न्यायालयात आपण दाद मागणार. ज्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत ते पोलिस ठाण्यात बसतात. तक्रार करणाऱ्या लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल करुन त्यांनाच लॉकअपमध्ये टाकले जाते. हा कुठला न्याय असा संतप्त सवाल आमदार गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.

कायद्याच्या राज्यात सर्वसामान : या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शाहूराज साळवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, बिल्डर मनोज राय आणि जमीनमालक गजानन म्हात्रे यांचे जमिनीच्या वादावरून कोर्टात प्रकरण सुरू आहे. शुक्रवारी या वादातून दोन्ही गटात हाणामारी झाली. दोघांच्या तक्रारींप्रमाणे परस्पर विरोधी गुन्हे नोंदविण्यात आले असून तपास सुरू आहे. शेवटी हे कायद्याच राज्य आहे. कायदा सर्वश्रेष्ठ आहे. जो कायद्याचे उल्लंघन करेल आणि निष्कारण खोटे आरोप लावेल त्याच्यावरही आम्ही कायदेशीर कारवाई करणार. त्यानुसार आमदारांवर देखील कारवाई केली असल्याचे वपोनि साळवे यांनी स्पष्ट केले

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट