विविध उपक्रम राबवून सत्कोंडी ग्रामपंचायत घेत आहे ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी

रत्नागिरी (प्रतिनिधी) : तालुक्यातील सत्कोंडी ग्रामपंचायतीने तिन्ही महसूल गावातील ग्रामस्थांची काळजी घेण्यासाठी कोरोनाचे काळात अतिशय चांगले उपक्रम राबविलेले आहेत. संस्थात्मक क्वारंटाईन करताना भविष्यात येणाऱ्या अडचण लक्षात घेऊन सत्कोंडी ने तयार केलेला होम क्वारंटाईनचां आराखडा संपूर्ण जिल्ह्यात राबविला गेला. सर्व गावात रोग प्रतिकार शक्ती वर्धक आर्सेनिक अल्बाम ३० या गोळ्यांचे वाटप केले. अनेक सेवाभावी संस्था मार्फत जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले, लोकडाऊन व क्वारंटाईन काळात घरपोच किराणा वस्तू आणून दिल्या तर रास्त धान्य दुकानातून मिळणारे रेशन एकत्रित रित्या आणून घरपोच दिले. सत्कोंडी ग्रामपंचायतीने संपूर्ण गावामध्ये फवारणी करून निर्जंतुकीकरण केले, सर्व ग्रामस्थांना सॅनिटायझर  वाटप केले तसेच गावातील प्रत्येक व्यक्तीला मास्कचे वाटप केले.  कोरोनाबाबत  ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली, जिल्ह्याबाहेरुन व राज्याबाहेरून (मुंबई .बंगळूर. गोवा. हैद्राबाद) आलेल्या ग्रामस्थांची संस्थात्मक क्वारंटाईन व होम क्वारंटाईनची काटेकोर व्यवस्था केली.  बाहेरून आलेल्या सर्व व्यक्तीची सर्व माहिती अद्ययावत ठेवली आहे. यामध्ये विद्यमान सरपंचा श्री सौ. प्रणालीताई मालप, तंटामुक्ती अध्यक्ष अरूण मोर्ये, ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय बैकर, ग्रामसेविक जाधव, पोलिस पाटील श्री महाकाळ व सौ बलेकर सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व आरोग्य कर्मचारी, सर्व अंगणवाडी सेविका, आशासेविका, विविध विकास सोसायटीचे अध्यक्ष किंजळे, यांचेसोबत उपसरपंच सतिश थुळ कौटुंबिक अडचणीत असतानाही लक्ष ठेवून होते. तसेच कोरोना ग्रामकृतीदल , तिन्ही गावांचे गावकर व वाडीकृतीदल, ग्रामस्थ व चाकरमानी समन्वय समिती, महिला बचत गटाने  देखील अतिशय चांगले योगदान देत आहेत. गावात कार्यरत असलेली महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राप्त व नेहरू युवा केंद्र भारत सरकारशी संलग्न असलेल्या स्वयंसेवी संस्था अक्टिव्ह फ्रेन्ड्स सर्कल चे आपत्ती व्यवस्थापनासाठी नोंदणी केलेले सभासद यांनीही भरीव योगदान दिले. सागरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री भोये साहेब यांनी देखील कामाचे कौतुक केलेले असून बीट अंमलदार श्री साळवी व श्री मनवल यांनी मोलाचे सहकार्य केले.

संबंधित पोस्ट