केंद्र सरकारकडून लॉकडाऊन 5 ची घोषणा

देशात कंटेनमेंट झोनमध्ये 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला.

मुंबई :(सुनील चव्हाण)देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देशातील कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयांकडून याचे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे.

केंद्र सरकारकडून नवे नियम जारी करण्यात आल्या आहेत. या लॉकडाऊन मध्ये अनेक नियम शिथील करण्यात आले आहे. प्रतिबंधित भाग सोडून इतर भागात प्रार्थना स्थळ, हाँटेल, रेस्टारंट सुरु होणार आहे. या विविध नियमाचं पालन करून पुढील गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.येत्या 8 जूनपासून या सर्व गोष्टी सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

लॉकडाऊन कसा वाढत गेला?

◼️पहिला लॉकडाऊन - 25 मार्च ते 14 एप्रिल

◼️दुसरा लॉकडाऊन - 15 एप्रिल ते 3 मे

◼️तिसरा लॉकडाऊन - 4 मे ते 17 मे

◼️चौथा लॉकडाऊन - 18 मे ते 31 मे

◼️पाचवा लॉकडाऊन - 1 जून ते 30 जून

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठका

◼️पहिली बैठक - 20 मार्च

◼️दुसरी बैठक - 2 एप्रिल

◼️दुसरी बैठक - 11 एप्रिल

◼️तिसरी बैठक - 27 एप्रिल

◼️पाचवी बैठक - 11 मे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा 24 मार्चला रात्री लॉकडाऊन घोषित केला होता. तो लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत होता. मग त्यामध्ये वाढ करुन तो 3 मे पर्यंत वाढवण्यात आला. त्यानंतरही भारतातील कोरोना वाढतच गेल्याने हा लॉकडाऊन 17 मेपर्यंत आणि त्यानंतर 31 मेपर्यंत वाढवण्यात आला.

अनलॉक 1 अशा पद्धतीने अमलात येईल.

1. मंदिर, मशिदी आणि सर्व प्रार्थनास्थळं 8 जूनपासून उघडणार

2. हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल 8 जूनपासून उघडणार

3. वरील गोष्टींसाठी लवकरच आरोग्य विभाग नियमावली जाहीर करणार

4. शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांबद्दलचा निर्णय जुलै 2020 मध्ये घेणार

5. राज्य सरकार शैक्षणिक संस्था आणि पालकांसह चर्चा करून केंद्राला कळवणार, त्यानंतर निर्णय

6. सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासादरम्यान तोंडावर मास्क किंवा कापड बांधणं बंधनकारक

7. लॉकडाऊन कंटेनमेंट झोन्समध्ये 30 जूनपर्यंत सुरू राहील. कंटेनमेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक गोष्टींना परवानगी असेल. लोकांच्या आत-बाहेर येण्यावर बंदी असेल

8. कंटनेमेंट झोन्सच्या बाहेर बफर झोन्स आखण्याचा निर्णय राज्य सरकार घेतील. बफर झोन्समध्ये आवश्यक ते निर्बंध राज्य सरकार घालू शकतात.  

9. सार्वजनिक ठिकाणी 6 फूट अंतर राखणं बंधनकारक. दुकानांमध्ये हे अंतर राखण्याची जबाबदारी दुकानदारांची. एका वेळी 5 लोकांनाच दुकानात प्रवेश द्यावा. 

10. लग्न समारंभात केवळ 50 लोकांनाच बोलवता येणार तर अंत्यसंस्कारांसाठी केवळ 20 लोकांनाच बोलवता येणार

11. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यावर राज्य सरकार दंड आकारणार. 

12. सार्वजिक ठिकाणी दारू, पान, गुटखा, तंबाखू खाण्यावर बंदी. 

13. शक्य असेल तर घरूनच काम करा. 

14. एका वेळी ऑफिसांत किंवा दुकानांत किंवा कारखान्यात गर्दी होऊ नये म्हणून तासांनुसार माणसांचं विकेंद्रीकरण करा. 

15. रात्रीच्या कर्फ्यूची वेळ बदलली. आता रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत कर्फ्यू. 

राजकीय, सांस्कृतिक तसंच कोणत्याही स्वरुपाच्या कार्यक्रमाला परवानी देण्यात आलेली नाही.

दुसऱ्या टप्प्यात शाळा-महाविद्यालयं, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास हे सुरू करण्याबाबत राज्य सरकारांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट