कर्जत तालुक्यातील शिलार परीसरातील प्रेम कुटीर वृध्दाश्रमात टॅंकरने पाणी पुरवठा करण्यास सुरुवात !

जीवनज्योत सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम!

कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील शिलार  गावा शेजारी असणाऱ्या प्रेम कुटीर व्रुद्धाश्रम येथे जीवनज्योत संस्थेचा वतीने टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आश्रमाच्या संचालकांसह अनेकांनी जीवनज्योत संस्थेचा या सामाजिक उपक्रमाने कौतुक केले आहे.

 याबाबत जीवनज्योत संस्थेचे सचिव राजेश गायकवाड यांनी दिलेल्या माहातीनुसार या येथिल व्रुद्धाश्रमाचा संचालिका श्रीमती मामी मॅडम यांनी या संस्थेकडे फोन करून आश्रमामध्ये पाणी टंचाई मुळे आश्रमातील वृध्दांचे खूप हाल होत आहेत असे कळविले, त्यामुळे आपण जीवन ज्योत सामजिक संस्थेने दरवर्षी प्रमाणे आम्हाला पाण्याचे टँकर चालू करावे अशी विनंती केल्याने या संस्थेचे सचिव राजेश गायकवाड यांनी ही बाब संस्थेचे इतर सहकाऱ्यांचा लक्षात आणून दिली. त्यानंतर लगेचच संस्थेचे  अध्यक्ष प्रकाश गायकवाड, कोषाध्यक्ष संदेश कदम, उपाध्यक्ष त्रिगुनेश जोशी, सहसचिव केदार बोरवणकर, सल्लागार शिल्पा पळणीतकर, मेधा मठकरी या सर्वांनी एकमताने निर्णय घेऊन पाऊस पडे पर्यंत एक दिवसा आड एक पाण्याचा टँकर या व्रुद्धा आश्रमात टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लागणारी आर्थिक मदतही जीवनज्योत संस्थेने या व्रुद्धाश्रमाचा संचालक मामी मॅडम यांच्या कडे जीवन ज्योत संस्थेचे सचिव तथा रायगड भूषण राजेश गायकवाड यांच्या मार्फत सुपुर्द केली आहे.   

यावेळी या आश्रमातील वयोवृध्द स्त्री, पुरुष, कर्मचारी वर्ग येथे उपस्थित होता. या सर्वांनी जीवनज्योत संघटनेचे आभार मानले आहेत. हा सर्व कार्यक्रम सुरक्षित अंतर (सोशल डिस्टन्स) ठेऊन करण्यात आला आहे. शासनाचे सर्व नियमांचे पालन करण्याचा सूचना यावेळी जीवनज्योत संस्थेने केल्या आहेत. त्यानंतर संघटनेचे सल्लागार अनिल सदावर्ते यांनीही काही सुचना येथे केल्या आसल्साचे सांगणेत येते. दरम्यान जीवनज्योत सामाजिक संस्था दरवर्षी अनेक आदिवासी वाड्या व दुर्बल भागांत जावुन उन्हाळयात अनेक ठिकाणी टॅंकरने पाणी पुरवठा करुन सामाजिक बांधिलकी जपत आसतानाच हे सामाजिक कार्य कोरोना संकटातही अविरत संस्थेंने चालु ठेवल्याने या संस्थेचे पदाधिकारी यांचे आभार व्यक्त होत आहेत.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट